भोपाळमधील सर्वात गजबजलेला रस्ता. संध्याकाळची वेळ असल्याने प्रत्येकालाच घरी पोहोचण्याची घाई. पण, या घाईतच अचानक वाहतूक ठप्प झाली. ही कोंडी कोणत्याही रस्त्याच्या कामामुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे नव्हती तर दोन वाहनचालकांमधील अहंकारातून झाली होती. एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे किरकोळ अपघात झाला. त्याचे रूपांतर पुढे वाद आणि भांडणात झाले. दोघेही रस्त्याच्या मधोमध उभे राहून एकमेकांवर ओरडत होते. एखाद्या खंदकात मोर्चा लढवणारे जणू सैनिक. भांडण जिंकण्याच्या ईर्षेने ते एवढे आंधळे झाले होते की, आपल्यामुळे मागे वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे, याचेही भान त्यांना नव्हते. या कोंडीत अडकलेली निष्पाप माणसे त्यांच्या अहंकाराचे बळी ठरत होती. त्या गर्दीत कदाचित भुकेने व्याकुळ झालेले एखादे मूल रडत असेल, तर कुणी गंभीर रुग्ण छातीवर हात ठेवून डॉक्टरकडे पोहोचण्याची प्रतीक्षा करत असेल. चालकांच्या रागाने इतरांचे जगणे कठीण केले होते. माणसाच्या याच प्रवृत्तीमुळे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील एका हृदयद्रावक घटनेची आठवण झाली. ही कथा आहे ‘सनी’ची. ही कथा मी अलीकडेच वाचली होती. फेब्रुवारी महिन्यात रशियन ड्रोनने युक्रेनच्या जपोरिज्जिया शहरावर हल्ला केला होता. प्रसारमाध्यमांनी नेहमीप्रमाणे पडलेल्या इमारती, आर्थिक नुकसान आणि दु:खद रूपाने संपलेल्या मानवी जीवनाचा वृत्तांत दिला. पण या ढिगाऱ्यात ‘सनी’ ही जखमी अवस्थेत पडला होता. युद्धातल्या अधिकृत आकड्यांमध्ये या मुक्या जीवाची कुठेच नोंद नव्हती. वेरोनिका कोन्कोवा या संवेदनशील जीवशास्त्रज्ञाने त्या ढिगाऱ्यातून सनीला बाहेर काढले. या घुबडाचा डावा डोळा निकामी झाला होता आणि एक पंख पूर्णपणे तुटला होता. त्याला एका डब्यात ठेवून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. उपचारादरम्यान सनीचा तो पंख कापून टाकावा लागला. आता तो प्रकाशालाही प्रतिसाद देऊ शकत नाही. घनदाट जंगलात उडण्याऐवजी तो आता एका पिंजऱ्यात जमिनीवर लंगडत फिरतो. त्याच्यासोबत तिथे इतरही अनेक जखमी पक्षी आहेत. त्यात दुर्मिळ गरुड, काळे घार आणि पेरेग्रीन ससाणे यांचा समावेश आहे. मानवी युद्धे वन्यजीवांचे नैसर्गिक जीवन उद्ध्वस्त करतात. स्थलांतर करणारे पक्षी युद्धक्षेत्रावरून उडताना थकून प्राण गमावतात. मोठे प्राणी स्फोटांच्या आवाजाने घाबरून मानवी वस्त्यांकडे धाव घेतात. समुद्रातील स्फोटांमुळे जलचरांचे आयुष्य धोक्यात येते. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, वेरोनिकाच्या केंद्रात असलेले हे पक्षी आता कधीच जंगलात परतू शकणार नाहीत. त्यांची नैसर्गिक शिकार करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली आहे. आता ते अन्नासाठी पूर्णपणे माणसावर अवलंबून आहेत. एवढेच नव्हे तर जंगलात उरलेली जनावरेदेखील अस्वाभाविक वर्तन करू लागले आहेत. प्राण्यांमधील मानसिक बदलांना या आघाडीवर प्रत्यक्ष काम करणारे सैनिक व जीवशास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. निसर्ग ना कधी युद्धविराम करू शकत, ना कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू शकतो. तो फक्त मानवी हिंसेचा त्रास मूकपणे सहन करतो. भोपाळच्या रस्त्यावर भांडणारे दोन चालक असोत, युरोपच्या भूमीवर एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागणारे दोन देश असोत किंवा बंद दाराआड भांडणारे आई-वडील असोत – संघर्षाचे सूत्र सगळीकडे सारखेच आहे. भांडणाऱ्यांचे लक्ष फक्त एकमेकांवर असते. पण त्यात होणाऱ्या नुकसानीची किंमत मात्र इतर निष्पाप जीवांना मोजावी लागते. आई-वडिलांच्या भांडणामुळे खोलीत स्वतःला कोंडून घेणारे घाबरलेले मूल, ट्रॅफिक जाममुळे रुग्णालयात पोहोचू न शकणारा रुग्ण आणि पिंजऱ्यात पंखांविना फडफडणारे घुबड – हे सगळे दुसऱ्याच्या हिंसेची किंमत मोजत असतात.
फंडा असा की, मानवी हिंसेमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या तिसऱ्या निष्पाप जीवाला किंमत मोजावी लागते. संघर्ष सुरू करण्यापूर्वी आपण कधी या या लोकांचा विचार करणार आहोत का?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



