आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, माणसानं शत्रूपासून कसं सावध राहावं? शत्रूचा पराभव कसा करावा? शत्रूवर वार करण्याची योग्य वेळ कोणती? शत्रूची चाल कशी ओळखावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात दोन प्रकारचे शत्रू असतात, एक म्हणजे बाहेरचे शत्रू, हे शत्रू उघड असल्यामुळे आणि तुमच्या ओळखीचे असल्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून कायम सावध राहू शकता, त्यांच्याविरोधात रणनीती बनवणं सहज सोपं असतं, मात्र दुसऱ्या प्रकारचे जे शत्रू असतात, ते अतिशय खतरनाक असतात, कारण हे शत्रू दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच असतात, आपल्याच घरातील असतात. असे शत्रू आपल्याला लवकर ओळखतात येत नाहीत, त्यामुळे आयुष्यात आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, तर अशा शत्रूंपासून सावध कसं राहायचं? घरातील शत्रू कसे ओळखायचे याबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
चाणक्य म्हणतात शत्रू हे दोन प्रकारचे असतात. बाहेरचे शत्रू आपल्याला माहिती असतात, मात्र घरातील शत्रू हे आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे खरा धोका त्यांच्यापासूनच असतो. त्यामुळे माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे. जर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तो तुमच्याबद्दल वाईट चिंतित असेल तर तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला त्याबद्दल खात्री होईल, तेव्हा अशा व्यक्तीपासून सावध राहण्यातच तुमचं हित आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
योजना – चाणक्य म्हणतात अशा लोकांपासून आपल्या योजना या नेहमी गुप्त ठेवाव्यात, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की घरातच तुमचा कोणीतरी शत्रू आहे, तेव्हा तुम्ही जर तुमच्या व्यवसायासंदर्भात किंवा भावी आयुष्यसंदर्भात एखादी योजना तयार केली असेल तर जोपर्यंत त्यामध्ये यश मिळत नाही, तोपर्यंत ती योजना गुप्त ठेवा, घरी देखील त्याबद्दल कोणतीही चर्चा करू नका.
पैसे – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या घरातच शत्रू असतो, तेव्हा तुम्ही किती कमवता? किंवा तुमच्याकडे किती मालमत्ता आहे? किती धन आहे, याची कधीच घरात देखील चर्चा करू नका, कारण अशा चर्चेमुळे तुमचा शत्रू तुमच्याविरोधात कट कारस्थान रचू शकतो.
विश्वासू माणूस – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या घरातच तुमचा शत्रू तयार होतो, अशावेळी तुम्हाला अशा एका तरी माणसाची आवश्यकता असते, ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकाल, आणि तुमच्या गैरहजेरीमध्ये असा माणूस तुमची सर्व कामे प्रामाणिकपणे करेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




