महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सर्वांचेच लक्ष महापौर कोण होणार याकडे लागले होते. पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या मंजुषा दीपक नागपुरे यांची पुण्याच्या नव्या महापौर म्हणून वर्णी लागली. तर आरपीआयचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारला. विरोधी पक्षांनी शेवटच्या क्षणी आपले अर्ज मागे घेतल्याने ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
पुणे महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने मंजुषा नागपुरे यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात होती. मात्र, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) उपमहापौर पद देऊन भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु सत्ताधारी बाकांवरील संख्याबळ आणि बिनविरोधची परंपरा कायम राखण्याच्या आवाहनानंतर विरोधकांनी माघार घेतली.
मुख्य संकल्प काय?
पीठासीन अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच वैध अर्ज उरल्याने ही निवड अधिकृतपणे जाहीर केली. नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासाचे काही मुख्य संकल्प जाहीर केले आहेत.
- वाहतुकीतून सुटका: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलांप्रमाणेच इतर गर्दीच्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलांचे नियोजन.
- जागतिक दर्जाचे सॅनिटेशन: त्यांच्या ज्या प्रकल्पाला Google Earth Award मिळाला आहे, तोच ‘महिला स्वच्छता गृह’ पॅटर्न संपूर्ण पुणे शहरात राबवणे.
- शिक्षण आणि आरोग्य: महापालिका शाळांचा दर्जा सुधारून तिथे डिजिटल शिक्षण सुरू करणे.
- पाणीप्रश्न: २४/७ समान पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून काम पूर्ण करणे.
- पर्यावरण: शहरात ७ नवीन ‘थीम बेस्ड’ उद्याने विकसित करून हरित पुण्याचे स्वप्न साकारणे.
दलित आणि बहुजन मतांची मोट बांधण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
मंजुषा नागपुरे यांची नियुक्ती ही केवळ राजकीय नसून त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा हा सन्मान मानला जात आहे. २०२६ च्या निवडणुकीत पुण्यातील पहिल्या बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान मिळवल्यानंतर आता महापौरपदाच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहराच्या विकासाची धुरा त्यांच्याकडे आली आहे. तसेच परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पद देऊन भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) मोठा सन्मान दिला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, दलित आणि बहुजन मतांची मोट बांधण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




