पुणे/आळंदी:
देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची २२ वर्षे सीआरपीएफ (CRPF) मध्ये सेवा देणाऱ्या एका माजी जवानाचा पुण्यात ट्रॅफिक कोंडीमुळे अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात पोहोचण्यासाठी झालेला केवळ १० मिनिटांचा विलंब त्यांच्या जीवावर बेतला. भिमाजी तुकाराम चौरे (वय ५९) असे या जवानाचे नाव आहे.
नेमकी काय घडली घटना?
आळंदीतील जगन्नाथ पार्क परिसरात राहणाऱ्या भिमाजी चौरे यांना रविवारी राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर हॉस्पिटल होते. रस्ता रिकामा असता तर ५ ते १० मिनिटांत ते हॉस्पिटलला पोहोचले असते. मात्र, आळंदीतील पद्मावती रोडवर मंगल कार्यालयांच्या गर्दीमुळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हृदयद्रावक दृश्य:
रस्ता पूर्णपणे जाम असल्याने चौरेंची पत्नी आणि मुलगी रिक्षाच्या पुढे धावत जाऊन वाहनचालकांना हात जोडून बाजूला होण्याची विनवणी करत होत्या. "प्लीज रस्ता द्या, माझ्या पतीचा जीव वाचवा," अशा आर्त हाका त्या मारत होत्या. मात्र, बेशिस्तपणे उभ्या असलेल्या गाड्यांमुळे त्यांना रस्ता मिळू शकला नाही. अखेर १० मिनिटांच्या अंतरासाठी २० ते २५ मिनिटे लागली आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत चौरेंची प्राणज्योत मालवली.
प्रशासनाविरुद्ध संताप:
आळंदीतील मंगल कार्यालयांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक कोंडीचा फटका एका जवानाला बसल्याने आळंदीकरांमध्ये तीव्र संताप आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेला किंवा रुग्णाला रस्ता न मिळणे हे व्यवस्थेचे मोठे अपयश असल्याचे बोलले जात आहे. ज्या जवानाने देशासाठी आयुष्य वेचले, त्याला ट्रॅफिकमुळे जीव गमवावा लागल्याने सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


