
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोडच्या उभारणीकरिता जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या जमिनींची आवश्यकता असून, या जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला बुधवार (दि. २८) पासून सुरुवात करण्यात आली. भूसंपादन कायद्यान्वये सक्तीचे भूसंपादन वेळखाऊ प्रक्रिया असून, प्रशासन २५ टक्के अधिक मोबदल्यासह थेट खरेदीने जमिनी घेण्यास प्रयत्नशील आहे. बुधवारी देवळालीसह काही गावांमध्ये शेतकऱ्यांकडून मोजणीला विरोध झाला. त्यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत समजूत काढण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंगरोडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार आणि जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. भूसंपादन आणि रिंगरोडची बांधणी याकरिता सरकारने सुमारे सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बाह्य रिंगरोड ६६ किलोमीटरचा असणार आहे. शहरालगतच्या काही गावांसह नाशिक, दिंडोरी, आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधील सुमारे १८ गावांमधून हा रस्ता जाणार आहे. शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी करणे आणि कनेक्टीव्हिटी वाढविणे हा या रस्ता बांधणीचा उद्देश आहे.
|
|
कोणत्या गावांमधून मार्ग?
याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु, या प्रकल्पासाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी देण्यास काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून हा रिंगरोड नाशिकच्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे यासह कोणत्या निकषानुसार मोबदला मिळणार याची माहिती देत आहेत. तरीही काही गावांमध्ये विरोध कायम असला तरी अनेक शेतकरी थेट खरेदीने जमिनी देण्यास तयार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. अशा शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणीला बुधवारी (दि. २८) सकाळी सुरुवात करण्यात आली. आडगाव, विहीतगाव, आंबेबहुला, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पंचक, वडनेर दुमाला, माडसांगवी, विल्होळी, मुंगसरा, देवळालीसह संबंधित गावांमध्ये एकाचवेळी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मोजणीला विरोध
जमीन मोजणी सुरू झाली असली तरी त्यास शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी विरोध होतो आहे. शहरात सिटी सर्व्हे कार्यालयाच्या माध्यमातून तर नाशिक आणि दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांच्या स्तरावरून एकाचवेळी जमिन मोजणीला सुरुवात झाली आहे. देवळालीत बुधवारी जमीन मोजणीला विरोध झाला. परंतु, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भूसंपादन कायद्याने जमीन खरेदीला किमान शंभर ते सव्वाशे दिवसांचा कालावधी लागतो.
परंतु, प्रशासनाने थेट खरेदीने जमिनी घेण्यास प्राधान्य दिले असून, याकरिता शेतकऱ्यांची संमती लागते. थेट खरेदीने होईल तेवढे भूसंपादन करण्याचा आमचा प्रयत्न असून, याकरिता प्रत्येक गावासाठी भूमी अभिलेखने एक अधिकारी नियुक्त केला आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक या अधिकाऱ्यांच्या मदतीला असल्याचे सांगण्यात आले. १० फेब्रुवारीपर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel




1 thought on “Nashik Ring Road : नाशिक रिंग रोडच्या कामांना गती; १० फेब्रुवारीपर्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण, १८ गावांना जोडणारा मार्ग कसा असेल?”