Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

Nashik : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे घडली आहे. घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केलेल्या तक्रारीवरून महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर संतप्त नातेवाईकांनी मयत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणात केला.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील कल्याणी संतोष शिरसाठ (वय ३५) या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या आत्महत्येनंतर माहेरची मंडळी आक्रमक झाली होती. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

विहिरीत उडी घेत संपविले जीवन

कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली; असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या आत्महत्येस जबाबदार म्हणून पती, सासू, सासरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्याची मागणी केली जात आहे .

सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या बहादुरी येथील सासरच्या घराच्या अंगणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. तर कल्याणीच्या अंत्यविधीस पती, सासरा व सासू हे उपस्थित नव्हते. अंगणात करण्यात आलेल्या अंत्यविधीच्या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *