Barvi Dam : ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी; जून महिन्यातच बारवी धरण ५० टक्के भरलं

 

Ambernath : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बदलापूर जवळील एमआयडीसी बारवी धरण जून महिन्यातच ५० टक्के भरले आहे. काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणात मागील वर्षी पेक्षा या वर्षी जवळपास दुप्पट पाणीसाठा साठा झाला आहे. यामुळे ठाणे जिल्हा वासियांची चिंता मिटली आहे.

बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रासह, ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीरा- भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणीपुरवठा होत असल्याने आजच्या घडीला धरण ५० टक्के क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांची चिंता मिटली आहे. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचे वर्णातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Buldhana Crime : सिनेस्टाईल पाठलाग सुरु असताना चोरट्यांच्या गाडीचा अपघात; पाच चोरटे पोलिसांच्या ताब्यात

गतवर्षीपेक्षा दुप्पट भरले धरण

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात ९९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण २५.३६ टक्के भरलं होतं. मात्र आज बारावी धरणात ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अशाच प्रकारे बारवी धरणात पाऊस सुरू राहिला; तर लवकरात लवकर बारवी धरण विक्रमी वेळेत भरण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

पालघर : पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. मात्र आज पावसाने थोडीशी उसंत घेतली असली तरीही पुन्हा पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार, तर काही भागात अति मुसळधार पाऊ



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *