
Karad : सातारा जिल्हा हा शरद पवारांचा. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हेतर भाजपचा बालेकिल्ला झाला असल्याचा टोला लगावताना, जिल्ह्यात महायुतीचे भाजप चार, शिवसेना (शिंदे), राष्ट्रावादी (अजित पवार) पक्षाला प्रत्येकी दोन जागांचे सूत्र ठरल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.
कदम म्हणाले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आपण नुकतीच भेट घेतली. त्यातून सातारा जिल्ह्यात भाजपला चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन आणि अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला दोन-दोन जागा असे विधानसभेसाठी जागावाटप राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचे कदम म्हणाले.
‘महायुती’ जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत जिंकेल अशीच सद्य:स्थिती आहे. भाजपने साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माण- खटावमधून जयकुमार गोरे या विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. कराड दक्षिणेतून डॉ. अतुल भोसले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. परंतु, ‘कराड- उत्तर’चा निर्णय अधांतरीच आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून फलटण आणि कराड उत्तर मतदारसंघांसंदर्भात कुठला मतदारसंघ पक्षाकडे ठेवायचा आणि कुठला सोडायचा किंवा काय याबाबत विचार सुरू आहे. फलटणमधील रामराजे समर्थक आमदार दीपक चव्हाण हे शरद पवार यांच्यासोबत गेल्याने अजित पवारांनी फलटण मतदारसंघ भाजपला सोडून ‘कराड उत्तर’साठी आग्रह धरला आहे. मात्र, भाजपची ‘कराड उत्तर’मध्ये मोठी ताकद असल्याने या मतदारसंघासाठी आम्ही फडणवीस, बावनकुळे यांना साकडे घातल्याचे कदम यांनी सांगितले.
‘कराड उत्तर’मधून भाजपचे मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भीमरावकाका पाटील आणि आपण स्वतः असे चौघेजण इच्छुक आहोत. परंतु, भाजप किंवा महायुतीकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण भाजप ताकदीने प्रयत्न करेल असे धैर्यशील कदम यांनी सांगितले. कराड उत्तरमधून भाजपतर्फे मी स्वतः इच्छुक असलो तरी भाजपने उमेदवारी दिली तरच लढणार आहे. अन्यथा, ‘महायुती’तून ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी कदम यांनी आपली व जिल्हा भाजपची भूमिका स्पष्ट केली.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


