
Pune : लष्कर जलकेंद्रातून कोरेगाव पार्क परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी पहाटे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पहाटे साधू वासवानी पुलाच्या कामासाठी जेसीबीने खोदाई करताना ही जलवाहिनी अचानक फुटली. फुटलेल्या जलवाहिनीचा शोध घेण्यास उशीर झाल्याने कोरेगाव पार्क भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.
पुणे स्टेशन भागात असलेल्या साधू वासवानी उड्डाणपुलाचे काम पालिकेच्या वतीने केले जात आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी पहाटे जलवाहिनी फुटली. ही माहिती तातडीने स्थानिक नागरिकांनी महापालिकेला कळविली. त्यानंतरदेखील दुपारी दोन वाजता पालिकेकडून या फुटलेल्या जलवाहिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामुळे कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड आणि नॉर्थ मेन रोडच्या दोन्ही बाजूचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरेगाव पार्क परिसराला लष्कर जलकेंद्रातून आलेल्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पहाटे या जलवाहिनीतून कमी प्रमाणात पाणी असल्याने त्याची तीव्रता कमी होती. मात्र, सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. या वेळी जेसीबीने खड्ड्यातून पाणी काढण्याचे काम सुरू होते. या प्रकाराची माहिती महापालिकेस देण्यात आली. त्यामुळे पालिकेकडून तत्काळ या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने महापालिकेस जलवाहिनी शोधण्यात अडचण येत होती. अखेर दुपारी जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
|
Pune : आचारसंहिता सुरू मात्र शहरातील राजकीय फ्लेक्सवर कारवाईस टाळाटाळ, काय आहे कारण ! |
या कामामुळे मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आज (बुधवारी) सकाळी कोरेगाव भागातील काही ठिकाणी उशीरा आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या आहेत. उच्चवर्गीय लोकवस्तीचा भाग अशी ओळख कोरेगाव पार्क परिसराची आहे. अनेक मोठ्या सोसायट्या, बंगले या भागात आहेत. नामांकित कंपन्यांची कार्यालय देखील याबाबत असल्याने हा पाणीबंद चा फटका त्यांनाही बसला असल्याची माहिती समोर आली.
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद
पुणे शहराला पणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला जॅकवेल, नवीन, जुने पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्र तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक तसेच देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे संपूर्ण पुणे शहर तसेच उपनगरांचा पाणीपुरवठा उद्या गुरुवारी (१७ ऑक्टोबरला) पूर्ण दिवस बंद राहणार आहे.
या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१८ ऑक्टोबरला) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. जलशद्धीकरण केंद्रातील कामे एका दिवसातच पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असताना शहरातील विविध भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पुणेकरांना हक्काच्या पाण्यापासून आजही वंचित राहावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



