
Maharashtra : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने व सर्व राज्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष काढून घेतले आणि ते स्वतःकडे घेतले आहे. आणि यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगली यश मिळाले असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्रीगोंदे येथे बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने राज्यामध्ये जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा श्रीगोंदा येथे आल्यावर माजी आमदार राहुल जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके ,युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राहुल जगताप, बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, दीपक भोसले, हरिदास शिर्के, केशवराव मगर ,जिजाबापू शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
|
Mumbai : पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय |
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सर्व नेते एकत्र असताना माघील लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार खासदार राज्यात निवडून आले होते मात्र सर्वजण सोडून गेले आणि आमचे आठ खासदार निवडून आले आहे. आणि याचे श्रेय आम्ही मोदी आणि शहा यांना देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजप नेते देशात व राज्यात काय तोऱ्यामध्ये वागत होते हे सर्वांनी पाहिले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या बूथ कमिट्या कोठे वाहून गेल्या हे देखील समजले नाही. याचे कारण ईडी सारख्या संस्था सांभाळणाऱ्यांना माणसे सांभाळता आले नाही. आणि शरद पवार यांनी मात्र आजपर्यंत माणसे जपली त्यामुळे हे यश मिळाले. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कोरडे ओढले तसेच सध्या रिझर्व बँकेकडून आठ लाख कोटी रुपयांचे यापूर्वीच कर्ज घेतलेले असताना पुन्हा आणखी नवीन कर्जाची मागणी या सरकारने केली आहे याचा अर्थ आम्ही सत्तेवरून तो जाणार आहोत परंतु जाताना राज्याची वाट लावून जाणार अशी भूमिका घेतली आहे अशी टीका श्री पाटील यांनी केली.
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, देशातील जनतेला भाजपने ईडी काय असते हे दाखवले. आणि या संस्थेमुळेच साहेबांचे बोट धरून राजकारणात आलेल्यांनी त्यांची बोट सोडले. आणि त्यांची अवस्था किती वाईट भाजपने केली आहे हे आता सर्व जनता पाहत आहे अशी टीका अजित पवार यांचे नाव न घेता अमोल कोल्हे यांनी केली. यावेळी बोलताना माजी आमदार राहुल जगताप पाटील म्हणाले की, कारखान्यासाठी एनसीडीसी चे कर्ज मिळत असताना देखील केवळ मी साहेबांच्या सोबत आहे म्हणून जाणीवपूर्वक डावलले गेले आहे. परंतु तुम्ही कितीही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, मला कितीही अडचणीत आणा तरी देखील मी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या पाठिंब्यावर साहेबांच्या सोबत कायम राहणार आणि साहेबांची साथ कधीही सोडणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कारखान्याचे राहिलेले पैसे ५ ऑक्टोबर पर्यंत सर्व देणे देण्यात येतील असे देखील राहुल जगताप पाटील यावेळी म्हणाले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




