
Pune / Yerawada : ‘विद्येचे आणि उद्योगाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला राज्यकर्त्यामुळे आता ‘कोयता गँग’चे विशेषण चिटकले आहे. पुण्यातील तरुणाई कोणत्या तरी गोळ्या (ड्रग्ज) खाऊन थेट चंद्रावर जात असून, गुन्हेगारी, अंमली पदार्थांमुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर केली. ‘कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून, इथला दिवटा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत होता, त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे,’ असा घणाघातही त्यांनी आमदार सुनील टिंगरेवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खराडी येथे महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार बापू पठारे, सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवकांनी पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली; तसेच पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य केले. ‘विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख होती. टेल्को, किर्लोस्कर, बजाज ऑटो हे औद्योगिक कारखाने पुण्याचे वैशिष्ट्य होते; परंतु आता कोयता गँग हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य झाले आहे. त्यामुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे,’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
|
|
‘वडगाव शेरीत ‘दमदार आमदार’ असे बोर्ड लावले आहेत. परंतु, हा आमदार कोणाच्या तिकिटावर निवडून आला, त्याच्या पक्षाचा नेता कोण होता, राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे अवघ्या हिंदुस्थानाला ठावूक आहे. या आमदाराला संधी दिली. त्यानंतर तो सोडून गेला. त्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे जनता ठरवेल. परंतु, चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणे सर्वस्वी अयोग्य आहे. या आमदाराने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने मते मागितली होती. त्यावर मतदारांनी श्रद्धेने मतदान केले. त्याचे उत्तरदायित्व अशा प्रकारे देणाऱ्या या आमदाराला दमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे. आमदार टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे. चुकीच्या लोकांना मदत करून, अयोग्य गोष्टींना खतपाणी घालणारा आमदार पुन्हा मते मागायची भूमिका घेत आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी टिंगरे यांचा समाचार घेतला.
आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका
'कल्याणीनगर 'पोर्श' कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून, इथला दिवटा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत होता, त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे,' असा घणाघातही पवार यांनी आमदार सुनील टिंगरेवर केला. आमदार टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे, असेही पवार म्हणाले.
‘महिलांना पैशांऐवजी संरक्षणाची गरज’
महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर बोलताना पवार म्हणाले, ‘या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, मुलींना पैसे देण्यापेक्षा संरक्षण देण्याची अधिक गरज आहे. बदलापूर प्रमाणे राज्यात दररोज मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नावाने मते मागताना, मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांना टाळता येणार नाही. आया-बहिणींकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन बदलणार नसेल, तर त्यांना जागा दाखवून देऊ.’
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



