
Pune / Yerawada : ‘विद्येचे आणि उद्योगाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला राज्यकर्त्यामुळे आता ‘कोयता गँग’चे विशेषण चिटकले आहे. पुण्यातील तरुणाई कोणत्या तरी गोळ्या (ड्रग्ज) खाऊन थेट चंद्रावर जात असून, गुन्हेगारी, अंमली पदार्थांमुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर केली. ‘कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून, इथला दिवटा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत होता, त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे,’ असा घणाघातही त्यांनी आमदार सुनील टिंगरेवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खराडी येथे महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार बापू पठारे, सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवकांनी पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली; तसेच पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य केले. ‘विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख होती. टेल्को, किर्लोस्कर, बजाज ऑटो हे औद्योगिक कारखाने पुण्याचे वैशिष्ट्य होते; परंतु आता कोयता गँग हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य झाले आहे. त्यामुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे,’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
|
|
‘वडगाव शेरीत ‘दमदार आमदार’ असे बोर्ड लावले आहेत. परंतु, हा आमदार कोणाच्या तिकिटावर निवडून आला, त्याच्या पक्षाचा नेता कोण होता, राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे अवघ्या हिंदुस्थानाला ठावूक आहे. या आमदाराला संधी दिली. त्यानंतर तो सोडून गेला. त्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे जनता ठरवेल. परंतु, चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणे सर्वस्वी अयोग्य आहे. या आमदाराने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने मते मागितली होती. त्यावर मतदारांनी श्रद्धेने मतदान केले. त्याचे उत्तरदायित्व अशा प्रकारे देणाऱ्या या आमदाराला दमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे. आमदार टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे. चुकीच्या लोकांना मदत करून, अयोग्य गोष्टींना खतपाणी घालणारा आमदार पुन्हा मते मागायची भूमिका घेत आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी टिंगरे यांचा समाचार घेतला.
आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका
'कल्याणीनगर 'पोर्श' कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून, इथला दिवटा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत होता, त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे,' असा घणाघातही पवार यांनी आमदार सुनील टिंगरेवर केला. आमदार टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे, असेही पवार म्हणाले.
‘महिलांना पैशांऐवजी संरक्षणाची गरज’
महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर बोलताना पवार म्हणाले, ‘या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, मुलींना पैसे देण्यापेक्षा संरक्षण देण्याची अधिक गरज आहे. बदलापूर प्रमाणे राज्यात दररोज मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नावाने मते मागताना, मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांना टाळता येणार नाही. आया-बहिणींकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन बदलणार नसेल, तर त्यांना जागा दाखवून देऊ.’
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



