
Pune : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर वेगवेगळ्या भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. वसाहतीत पाणी शिरल्यानंतर तातडीने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविणे, तसेच वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर तातडीने धाव घेऊन मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे काम कौतुकास पात्र ठरले. पाणी शिरलेल्या भागात तातडीने मदतकार्य करून जवानांनी २५४ जणांची सुटका केली.
शहरात बुधवारी रात्रीनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. सलग बारा तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात ७८ ठिकाणी झाडे पडली. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी सोसायटीसह शहरातील २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे जुन्या घराच्या भिंत पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बुधवारी रात्रीपासून अग्निशमन दलाच्या २० अधिकाऱ्यांसह २०० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या भागात झाडे कोसळणे, तसेच पाणी शिरण्च्या घटना एकापाठोपाठ घडल्याने धावपळ उडाली, असे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.
|
|
अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण केंद्रातील दूरध्वनी रात्रभर खणाणत होते. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी मदतकार्यात भूमिका बजावली. त्वरीत अग्निशमन दलाचे बंब, जवानांना घटनास्थळी रवाना करण्याच्या सूचना देण्यात आला. पावसाळ्यातील दिवस म्हणजे अग्निशमन दलाच्या जवाानांच्या दृष्टीने युद्धाचे प्रसंग असतात, असे त्यांनी नमूद केले.
पोलिसही मदतकार्यात सहभागी
भिडे पुलासह शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. काही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. भिडे पूल, जयंतराव टिळक पूल, होळकर पूल, शांतीनगर पूल, मांजरी पूल वाहतुकीस बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाणी शिरलेल्या भागात पोलिसांनी ध्वनीवर्धकावरुन सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहकार्य करून तातडीने रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविले. काही भागात रस्त्यावर पाणी साचले होते. या भागातील ड्रेनेजमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. महापालिका कर्मचाऱ्यांना या बाबतची माहिती देऊन वाहतूक सुरळीत केली.
शहर
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!

























Subscribe to my channel




