
Mumbai : महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा वाढण्यास आता सुरुवात झाली आहे. काल 4 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता होती आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळाली. तर विदर्भातील अकोल्यात 38 अंशांपर्यंत सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं असून, तीव्र उन्हाचा तडाखा आजही जाणवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पूर्वसूचनांमुळे सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
उष्णतेचा यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 33-37 अंश सेल्सियस, किमान 22-22 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य तीकाळजी घ्यावी. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत भट्टीची जाणीव
उन्हाळ्याची सुरुवातच मुंबईकरांसाठी उन्हाच्या तडाख्याने झाली आहे. सांताक्रूझ येथे बुधवारी 38.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे 35.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. यंदाच्या उन्हाळ्यात कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईमध्ये बुधवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 5.7 अंशांनी, तर कुलाबा येथे 4.5 अंशांनी अधिक होता. डहाणू येथे 6.2, तर अलिबाग येथे 4.2 अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. कोकण विभागात पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना आज, गुरुवारीही उष्ण आणि आर्द्र वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये बुधवारच्या तुलनेत आज, गुरुवारी तापमानाचा ताप किंचित कमी होऊ शकेल.
किमान तापमानाचा पाराही चढा
24 तासांमध्ये तापमानाचा पारा एकाएकी चढल्याने मुंबईकरांना झळांची तीव्रता अधिक जाणवली. दुपारी उशिरापर्यंत मुंबईकरांनी गरम झळांची जाणीव होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. आर्द्रता वाढल्याने किमान तापमानाचा पाराही चढा होता. कुलाबा येथे काल बुधवारी 24 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले, तर सांताक्रूझ येथे 22.6 किमान तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर अनुक्रमे 2.3 आणि 2.6 अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा किमान तापमान अधिक असल्याची नोंद झाली. डहाणू येथे किमान तापमान सरासरीपेक्षा 3.2 अंशांनी अधिक होते. प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे कोकण विभागातील तापमान आणि आर्द्रता वाढली. ही प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आज, गुरुवारपर्यंत थोडी दूर जाईल. त्यामुळे मुंबईमध्ये उष्मा कमी जाणवेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी वर्तवला.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




