
Pune : आर्थिक अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना बळ देण्यासाठी उपपदार्थनिर्मिती प्रकल्प आता ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे कारखान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही आणि उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. मात्र, खासगी गुंतवणुकदारांच्या सहभागातून हा प्रकल्प उभा राहणार असल्याने सहकारी साखर कारखान्यांमध्ये खासगी गुंतवणुकीचा शिरकाव होणार आहे.
साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रगण्य राज्य आहे. साखरेबरोबरच बगॅस, मळी आणि प्रेसमड या उपपदार्थांपासून सहवीजनिर्मिती, आसवणी, इथेनॉल, बायोगॅस, मद्य, मिनरल वॉटर, कागद, बायोगॅस; तसेच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. उपपदार्थ उत्पादन केल्यास साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार कॉम्प्रेस्ड बायोगॅस, शाश्वत विमान इंधन आणि औषधनिर्मितीतील सक्रिय घटक निर्मितीची संधीही उपलब्ध आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील सविस्तर निकष, कार्यपद्धती आणि कराराच्या अटी निश्चित करून, सर्वसमावेशक धोरण जाहीर केले आहे.
मागील सलग तीन वर्षे तोटा, सलग तीन वर्षे नक्तमूल्य घट, कर्जउभारणीची मर्यादा संपणे, मागील तीन आर्थिक वर्षांत लेखापरीक्षण ‘क’ किंवा ‘ड’ वर्गात असणे, मागील तीन गाळप हंगामात क्षमतेपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा कमी गाळप आणि थकबाकी अशा कारखान्यांना उपपदार्थनिर्मितीसाठी अर्ज करता येणार आहे. उपपदार्थ प्रकल्प उभारण्यापूर्वी संचालक मंडळाचा ठराव आवश्यक असेल. त्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज करणे बंधनकारक राहील. गुंतवणुकदारांची छाननी करून पात्र ठरलेल्यांकडून ई-निविदा प्रक्रियेत आर्थिक प्रस्ताव मागवले जातील. वार्षिक भाडे, अनामत रक्कम, करार कालावधी, कच्चा माल दर, वीजदर आदी बाबी करारात स्पष्ट करण्यात येणार आहे. पाच कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीस साखर आयुक्त स्तरावरील समिती मान्यता देईल; त्यापेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले जाणार आहेत.
समिती ठरवणार अटी
कल्पनिहाय निकष व अटी साखर आयुक्त स्तरावरील समिती ठरवणार आहे. या निर्णयामुळे कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढेल, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, विकासासाठी निधी उपलब्ध होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याचा आधार मिळेल, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




