Palghar : नालासोपाऱ्यातील रक्तरंजित, 14 दिवसांत 6 मृतदेह रस्त्यावर, रिअल लाइफ सीरिजने नागरिकांमध्ये भय!

Palghar : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार आणि नालासोपारा भाग सध्या भीतीच्या सावटाखाली आहे. गुन्हेगारांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपले धुमाकूळ सुरू ठेवल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या १४ दिवसांत तब्बल ६ मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवे लगतच्या निर्जन स्थळांचा वापर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी होतोय, अशी शंका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.

कचऱ्यातून सापडला मृतदेह

रविवारी संध्याकाळी विरार फाट्याजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. पोलिसांनी कचरा उपसून पाहिला, तेव्हा ४५ ते ५० वयोगटातील एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र, हा नैसर्गिक मृत्यू आहे की खून, याची चौकशी सुरु आहे.

१४ दिवसातील थरारक घटना

गेल्या दोन आठवड्यात वसई-विरारच्या वेगवेगळ्या भागात सापडलेल्या मृतदेहांच्या मालिकेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • धानिवबागमध्ये अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा विहिरीत मृतदेह सापडला.
  • पेल्हार फाट्यावर एका व्यक्तीचा शिरच्छेद करून क्रूर हत्या झाली.
  • नालासोपारामध्ये डी-मार्टसारख्या वर्दळीच्या परिसरातील नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला.
  • फूलपाडा व विरार फाटा येथेही अज्ञात पुरुषांचे मृतदेह सापडले.

हायवेवर गुन्हेगारांचं साम्राज्य?

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सूनसान जागा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव गुन्हेगारांसाठी संधी ठरत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मृतदेह फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. "आमच्या घराबाहेर पडताना आता भीती वाटते, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?" असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.

पोलीस यंत्रणेच्या समोर आव्हान

या प्रकारामुळे वसई-विरार पोलीस दलाला मोठे आव्हान आहे. मृतदेहांची ओळख पटवणे आणि मृत्यू कसा झाला हे शोधणे हे दोन्ही स्तरावर काम करण्याची गरज आहे. नागरिकांकडून हायवेवर गस्त वाढवण्याची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणीही करण्यात येत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *