
Mumbai : महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी पाऊस पडला. रेणापूर तालुक्यात सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान गारपिटीमुळे काही ठिकाणी पत्र्याची घरे पडली आहेत; तसेच गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेलाच दिसत आहे. आज, 25 फेब्रुवारीला, दिवसभर राज्यातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया.
विदर्भात मोठे नुकसान
काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
राज्यातील सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा आणि विदर्भला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विर्दभातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.
मुंबईत पारा चढणार
दरम्यान, मुंबईमध्ये उकाडा कायम आहे. मंगळवारी संपूर्ण शहरात सरासरीपेक्षा 3.2 अंश अधिक तापमान नोंदवलं गेलं होतं. मुंबईमध्ये तापमानाचा पारा बुधवारी 25 फेब्रुवारी रोजीही चढाच असेल, असा अंदाज आहे. त्यानंतर दोन दिवस एखाद्या अंशांनी कमाल तापमानात दिलासा मिळेल, परंतु हा दिलासा फार काळ मिळणार नसून पुन्हा एकदा तापमान चढू लागेल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात दोन दिवसांनी तापमानाचा पारा चढू लागेल. आठवडाभर हे चढे तापमान कायम असेल, अशी शक्यता आहे.
पावसामुळे मोठं नुकसान
सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ज्वारीचे धाट आडवे पडले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. रेणापूर तालुक्यात झालेल्या पिकाच्या आणि घराच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे करून शेतकर् यांना आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने विनविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी केली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel





Join our affiliate community and earn more—register now!