
Mumbai : महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी पाऊस पडला. रेणापूर तालुक्यात सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान गारपिटीमुळे काही ठिकाणी पत्र्याची घरे पडली आहेत; तसेच गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेलाच दिसत आहे. आज, 25 फेब्रुवारीला, दिवसभर राज्यातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया.
विदर्भात मोठे नुकसान
काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
राज्यातील सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा आणि विदर्भला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विर्दभातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.
मुंबईत पारा चढणार
दरम्यान, मुंबईमध्ये उकाडा कायम आहे. मंगळवारी संपूर्ण शहरात सरासरीपेक्षा 3.2 अंश अधिक तापमान नोंदवलं गेलं होतं. मुंबईमध्ये तापमानाचा पारा बुधवारी 25 फेब्रुवारी रोजीही चढाच असेल, असा अंदाज आहे. त्यानंतर दोन दिवस एखाद्या अंशांनी कमाल तापमानात दिलासा मिळेल, परंतु हा दिलासा फार काळ मिळणार नसून पुन्हा एकदा तापमान चढू लागेल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात दोन दिवसांनी तापमानाचा पारा चढू लागेल. आठवडाभर हे चढे तापमान कायम असेल, अशी शक्यता आहे.
पावसामुळे मोठं नुकसान
सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ज्वारीचे धाट आडवे पडले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. रेणापूर तालुक्यात झालेल्या पिकाच्या आणि घराच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे करून शेतकर् यांना आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने विनविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी केली आहे.
शहर
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
महाराष्ट्र
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप


























Subscribe to my channel





Join our affiliate community and earn more—register now!