T20 WC 2026 : टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशावरुन पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीयांना चीड आणणारा दावा

T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 टुर्नामेंट सुरु आहे. सुपर-8 राऊंडची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आठ टीममध्ये मुकाबला होईल. या टीम्सची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज ग्रुप 1 मध्ये परस्पराविरुद्ध खेळतील. अन्य चार टीम्स श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या रोमांचक ग्रुप लढतींची सुरुवात होण्याआधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर यांने एक धक्कादायक दावा केला आहे.

सुपर-8 राऊंडला सुरुवात होण्याआधी मोहम्मद आमिर आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्याने भविष्यवाणी केलीय की, भारत या टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. सुपर-8 राऊंडमध्येच भारताचा प्रवास संपुष्टात येईल असा दावा मोहम्मद आमिर याने केला आहे. भारत यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचा यजमान आणि विद्यमान चॅम्पियन संघ आहे. टीमने आपल्या ग्रुपमध्ये शानदार प्रदर्शन केलय. भारताने आपले चारही सामने जिंकलेत. टीम इंडिया टुर्नामेंटमधील फेवरेट टीम मानली जात आहे. पण भारत सेमीफायनलमध्ये खेळणार नाही असं आमिर याला वाटतं.

भारताचा ग्रुप सर्वात टफ का?

“भारत टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. पाकिस्तान विरुद्ध सामना सोडल्यास भारतीय फलंदाजांची फळी प्रत्येक सामन्यात कोसळलीय. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज टीम ज्या पद्धतीने खेळतायत, ते कुठल्याही टीमला हरवू शकतात” असं मोहम्मद आमिर GEO TV वर एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला. सुपर-8 राऊंडमध्ये ग्रुप-1 खूप मजबूत आहे. ग्रुप-1 मधील चारही टीम्सनी आतापर्यंत एकाही पराभवाचा सामना केलेला नाही. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने आपपाल्या ग्रुपमधील 4-4 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेने तीन विजय आणि नो रिझल्ट सामन्यासह सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे.

सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी किती सामने जिंकावे लागतील?

सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडिया 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सामना होईल. भारताचा सुपर-8 मधील अखेरचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध 1 मार्चला कोलकातामध्ये होईल. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी कमीत कमी 2 मॅच जिंकाव्या लागतील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *