दिल्लीतील नामांकित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या(एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचीउपस्थिती म्हणजे प्रत्यक्षात पुढील वर्षी उत्तर प्रदेश,गुजरात, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, मणिपूर आणिगोव्यात होणाऱ्या निवडणुकांचे ‘कर्टेन रेझर'' मानले जाऊशकते. पंतप्रधान देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांच्या समूहालासंबोधित करत होते. पण निवडणुकांत तरुण जेन-झीआणि अगदी जेन-अल्फाचेही महत्त्व स्वीकारण्यासारखेहोते. देशाच्या राजकीय पटलावर या तरुणांनी कायस्थान मिळवले आहे, हे मोदी चांगल्या प्रकारे जाणतात.आज कोणताही पक्ष त्यांना दुर्लक्षित करण्याचा धोकापत्करू शकत नाही. म्हणूनच राहुल गांधी ‘छात्रों कीगूंज’ हा उपक्रम चालवत आहेत, तर पंतप्रधान एसआरसीसीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. निवडणुकीचे राज्य मोठे असो वा छोटे, लोकसभा निवडणुकीवरील त्याच्या प्रभावामुळे सत्ताधारी वविरोधक दोघांसाठीही ते महत्त्वाचे आहे. आगामी निवडणुकांत भाजपसाठी बऱ्याच गोष्टी पणाला लागल्या आहेत. बंगालमधील विजयाने भाजपच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण केले होते. मात्र, जेन- झीच्याआंदोलनानंतर पक्षाची लय बिघडल्यासारखी वाटूलागली. अशा स्थितीत मोठी राज्ये हातातून निसटली,तर ती भाजपसाठी अजिबात अनुकूल स्थिती नसेल.गोव्यात 2012 पासून भाजपची सत्ता आहे. तिथेअँटी-इन्कम्बेंसीचे परिणाम दिसू लागला आहेत . तरीहीइतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही काँग्रेसने गैर-भाजपपक्षांशी आघाडी करण्यात फारसा रस दाखवलेला नाही.गेल्या निवडणुकीत 10% मते मिळवणाऱ्या आणि‘जेन-झी''च्या हिताची भाषा करणाऱ्या ‘रिव्होल्युशनरीगोअन्स पार्टी'' या नव्या पक्षाशी काँग्रेस चर्चा नक्कीचकरत आहे. परंतु ''गोवा फॉरवर्ड पार्टी''सोबतची आघाडीकायम ठेवण्यात किंवा ‘आम आदमी पार्टी''सोबतजुळवून घेण्यात तिने उत्सुकता दाखवलेली नाही.पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस,शिरोमणी अकाली दल, भाजप आणि अमृतपाल सिंगयांच्या नेतृत्वाखालील खालिस्तानसमर्थक अकाली दल(वारिस पंजाब दे) यांच्यात पंचकोनी लढत होऊशकते. अमृतपाल 2023 पासून तुरुंगात आहेत. भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र आले, तर हाचौकोनी सामना ठरेल. या आघाडीची शक्यता नाकारतायेत नाही. कारण सुखबीर बादल काही वेळापूर्वीचपंतप्रधानांना भेटले होते. राजकीय वर्तुळात या भेटीलादाखवण्यापुरते म्हटले गेले. दोन्ही पक्षांना ही आघाडीहवी आहे, पण ते सोपे नसेल. जागांसाठी भाजपच्याकडक घासाघिशीमुळे अकाली दलाचे काही नेते आणिकार्यकर्ते ‘वारिस पंजाब दे''च्या बाजूने जाऊ शकतात.राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या समस्येचा सामनाकरण्यासाठी भाजपने सप्टेंबरमध्ये ‘नशा मुक्ती यात्रा’काढण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत अकालीदलासोबतची त्यांची आघाडी या मोहिमेच्याविश्वासार्हतेला तडा देऊ शकते. दुसरीकडे, आप सत्तावाचवण्यासाठी धडपडत आहे. एकदा वरचढ दिसणारीकाँग्रेस सध्या दुभंगली आहे. या निवडणुकीच्यारणधुमाळीत अमृतपाल सिंग यांची सुटका झाली, तरराजकीय चित्र आणखी विस्कळीत होईल आणि आपण‘किंगमेकर’ म्हणून पुढे येऊ, अशी आशा भाजपलावाटत आहे. मात्र, मोठी राजकीय लढाई उत्तर प्रदेशातलढली जाणार आहे. या राज्यातील 80 लोकसभा जागात्याला इतर राज्यांपेक्षा वेगळे आणि महत्त्वाचे स्थानदेतात. भाजपने 2014 मध्ये इथे 71 आणि 2019 मध्ये 62जागा जिंकल्या नसत्या किंवा नरेंद्र मोदींनी वडोदरा सोडूनवाराणसीद्वारे युपीला आपली कर्मभूमी बनवले नसते, तरआज राष्ट्रीय राजकारणातील भाजपचा प्रवास खूपवेगळा असता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांच्यासाठीही ही मोठी पणाला लागलेली लढाई आहे. तेतिसऱ्यांदा युपीचे मुख्यमंत्री झाले, तर मोदींनंतरच्याकाळात देशाच्या सर्वोच्च पदाच्या दावेदारात तेआघाडीवर असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातीलअनेकांचा पाठिंबा योगींना आहे. युपीबाहेरही त्यांचा मोठासमर्थक वर्ग आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या ताज्या तिरुपतीदौऱ्यात तेथील लोकांनी अत्यंत उत्साहात त्यांचे स्वागतकेले होते. ब्रिटनच्या ‘फायनान्शियल टाइम्स’च्या एकाअहवालात तर योगींचा उल्लेख नरेंद्र मोदींचे संभाव्यवारसदार म्हणूनही करण्यात आला आहे! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) निवडणुकीचे राज्य मोठे असो वा छोटे, 2029च्या लोकसभा निवडणुकीवरील प्रभावामुळेसत्ताधारी व विरोधक दोघांसाठीही त्याचे महत्त्वआहे. आगामी निवडणुकांत विशेषतःभाजपसाठी खूप काही पणाला लागले आहे.त्यामुळे मोठी राज्ये हातून निसटू देण्याची चूकभाजप नक्कीच करणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



