गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरासह विविध भागांतून लाखो गणेशभक्त आणि चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर रवाना झाले आहेत. मात्र, या आनंदाच्या प्रवासात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि गणेशभक्तांच्या मार्गात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून, विशेषतः पळस्पे फाटा, इंदापूर आणि माणगाव या प्रमुख परिसरांमध्ये तब्बल ८ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत रखडावे लागत असून प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या या अफाट गर्दीमुळे आणि महामार्गावर वाहनांची संख्या अचानक कैक पटीने वाढल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला आहे. माणगाव आणि इंदापूर या परिसरांमध्ये महामार्गाचे चौपदरीकरण आणि बाह्यवळण (बायपास) रस्त्यांची रखडलेली कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे या भागांत वाहनांना जुन्याच अरुंद रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच हे मार्ग थेट शहरांच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून जात असल्यामुळे वाहनांची प्रचंड गती मंदावते आणि एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागत असल्याने वाहनांच्या रांगाच्या रांगा तयार होत आहेत. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्या वाहनचालकांना पाऊण ते एक तास इतका विलंब लागत आहे. याशिवाय वाकण, पाली, निजामपूर आणि श्रीवर्धन, म्हसळा या भागांतून येणारे मार्ग याच मुख्य ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांचे क्रॉसिंग होते आणि कोंडीत भर पडते.
पळस्पे फाट्याविषयी बोलायचे झाल्यास, मुंबई-गोवा महामार्ग आणि जेएनपीटी (JNPT) कडून पुण्याच्या दिशेने जाणारे मार्ग याठिकाणी एकत्र येतात. बंदरातून येणारी अवजड वाहतूक मोठ्या संख्येने या परिसरात येते. प्रशासनाने जरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या सर्व अवजड वाहनांवर टप्प्याटप्प्याने पूर्ण बंदीचे आदेश दिले असले, तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी अजूनही काही ट्रक आणि केमिकल टँकर रस्त्यांवर किंवा सर्व्हिस रोडवर उभे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक नियमन अधिक कठीण बनले आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे वाहतुकीची समस्या आणखीनच गंभीर झाली आहे.
दरम्यान, महामार्गावर निर्माण झालेली ही कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन तसेच वाहतूक विभातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसशिने प्रयत्न सुरू आहेत. रायगड पोलिसांनी महामार्गावरील काही ठराविक पट्ट्यांमध्ये वाहनांना थांबण्यास तसेच पार्किंग करण्यास सक्त मनाई केली आहे. असे असले तरी, आगामी दोन दिवसांत कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने, आगामी काळात वाहतूक यंत्रणेसमोर मोठे आव्हान असणार आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: जन्मदात्यांना स्पष्ट नकार देत ११ वर्षांच्या चिमुरडीने निवडले मायेने वाढविणाऱ्या शेजाऱ्यांचे घर; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- नागपुर: आर्थिक विवंचनेतून अत्यंत दुर्दैवी घटना; उधारीचे पैसे फेडता येत नसल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात संपवले जीवन!
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
महाराष्ट्र
- मुंबई: जन्मदात्यांना स्पष्ट नकार देत ११ वर्षांच्या चिमुरडीने निवडले मायेने वाढविणाऱ्या शेजाऱ्यांचे घर; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- नांदेड: शिवसेना सत्तासंघर्ष कायदेशीर अपडेट ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण, आता शिंदेसेना मांडणार बाजू; नांदेडमधून संजय राऊतांचा महायुतीवर जोरदार प्रहार!
- बीड: साहित्य क्षेत्राचा मोठा सन्मान! प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना प्रतिष्ठेचा 'स्व. भगवानराव लोमटे राज्य पुरस्कार' प्रदान!
- नागपुर: आर्थिक विवंचनेतून अत्यंत दुर्दैवी घटना; उधारीचे पैसे फेडता येत नसल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात संपवले जीवन!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



