प्रियदर्शन यांचा कॉलम:नवीन जागतिक नकाशा ‎आपल्या धारणाही बदलतो‎

‎‎‎‎‎‎‎‎4 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राने जगाच्या नव्या नकाशाला‎मंजुरी दिली. यासाठी झालेल्या मतदानात 164 देशांनी‎शिक्कामोर्तब केले. सहा देश मतदानापासून दूर राहिले, तर‎अमेरिकेने याच्या विरोधात मतदान केले. भारतानेही या‎नकाशाच्या बाजूने मतदान केले, पण आता असे समोर येत‎आहे की, या नकाशामध्ये भारतीय राष्ट्र-राज्याच्या‎सीमारेषांशी छेडछाड करण्यात आली आहे. आसामला‎लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या दक्षिणेकडील‎सीमेला ‘चिनी रेषा’ म्हणून दाखवण्यात आले आहे आणि‎नागालँड-आसाम यांच्यातील रेषाच गायब आहे.‎दुसरीकडे तिबेटला भारतीय रेषेत दाखवण्यात आले आहे. ‎‎चीननेही या नकाशाला मंजुरी दिली आहे. भारताचे म्हणणे ‎‎आहे की, ते ‘समान-विश्व’ या भावनेसोबत आहेत आणि‎याच अनुषंगाने नकाशाला पाठिंबा दिला आहे, पण हा वाद ‎‎सांगतो की, जगाचा नकाशा बनवणे सोपे काम नाही. तसेही पृथ्वी गोल आहे आणि ती रेषाविरहित आहे. खरे तर ‎‎आतापर्यंत जगाचा जो नकाशा चलनात होता, तो‎सोळाव्या शतकात गेरार्डस मर्केटर या नकाशाकाराने‎समुद्री प्रवासाला डोळ्यांसमोर ठेवून बनवला होता. या‎नकाशात आफ्रिका एक-तृतीयांश लहान आहे. युरोप,‎उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड मोठे दाखवले आहेत, तर‎आग्नेय आशियातील देशांनाही त्यांच्या मूळ आकाराच्या‎तुलनेत खूपच कमी जागा मिळाली आहे. आफ्रिकेत हा‎नकाशा बदलण्यासाठी आंदोलन झाले आणि शेवटी‎संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मतदानाद्वारे नवीन नकाशा‎मंजूर केला. हा नवीन नकाशा 2018 मध्ये ‘नॉर्थ अमेरिकन‎कार्टोग्राफिक इन्फॉर्मेशन सोसायटी’च्या परिषदेत सादर‎केलेला “इक्वल अर्थ मॅप” (समान पृथ्वीचा नकाशा)‎आहे. यामध्ये युरोप पूर्वीच्या तुलनेत आकुंचन पावलेला‎दिसतो, ब्राझील फुगलेला दिसतो आणि ग्रीनलँड जणू‎हरवूनच गेला आहे. आफ्रिकेला मात्र यात पूर्ण प्रतिनिधित्व‎मिळाले आहे. कागदावर छापलेला आणि आपल्या मनात‎घर करून बसलेला ‘अ‍ॅटलस’ही फार जुना नाही. आपण‎जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या नकाशाशी आजच्या‎नकाशाची तुलना केली, तर जगातील ताकदवर देश कुठे‎गायब झाले आणि कोणते नवीन देश नकाशावर उभे‎राहिले, हे पाहून आपण थक्क होऊ. विसाव्या शतकाच्या‎सुरुवातीच्या 15 वर्षांच्या नकाशात सोव्हिएत युनियनचा‎मागमूसही नव्हता. जो नंतर अचानक जगातील मोठी‎महासत्ता बनला आणि शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत‎लुप्तही झाला. विसाव्या शतकाच्या पहिल्या चार‎दशकांपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात नव्हता आणि सात‎दशकांपर्यंत बांगलादेश नव्हता. विसाव्या शतकाच्या‎सुरुवातीला जो भारत होता, त्याच्या सीमा इराणला‎भिडलेल्या होत्या. म्हणजेच, ज्या सीमा आपण अगदी‎कायमस्वरूपी मानतो, जणू काही त्या संस्कृतीच्या‎उदयापासूनच चालत आल्या आहेत, त्या खरे तर‎विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील राजकीय‎उलथापालथीचा परिणाम आहेत. संस्कृती या देशांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎राजकीय नकाशांपेक्षा मोठ्या आणि जुन्या असतात.‎मानवी हिताचे विषयही त्या राजकारणापेक्षा मोठे असतात,‎जे राजकारण अनेकदा आपल्या स्वार्थासाठी विविध‎ओळख वापरते आणि त्यांना आपापसात लढवते- मग ते‎देश असोत वा धर्म असोत.‎ नवीन नकाशा मुळे मर्केटरचा नकाशा पुसला जाणार नाही,‎आणि जुने पृथ्वीगोलही (ग्लोब) फोडले जाणार नाहीत.‎जहाजांच्या ये-जा करण्यासाठी ते अजूनही उपयुक्त‎आहेत. पण संयुक्त राष्ट्र जगभरातील सरकारे, शाळा‎आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना असे आवाहन करणार आहे‎की, जेव्हाही ते ठिकाणांची तुलना करतील तेव्हा ती नव्या‎नकाशानुसार करावी. म्हणजेच आता जगाकडे‎पाहण्यासाठी आपल्याकडे दोन चष्मे असतील. जे‎आपल्याला याची आठवण करून देत राहतील की, हे‎जगही एकेरी नाही आणि आपली दृष्टीही एकेरी असू नये.‎पण आपल्याला या नकाशामध्ये आपला भाग सुरक्षित‎आणि स्वीकृत हवा आहे, यात कोणताही वाद नाही.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ जगाचा नकाशा सतत बदलत राहिला आहे.‎कागदावर बनलेला आणि आपल्या डोक्यात‎कोरला गेलेला ‘अ‍ॅटलस’ही खूप जुना नाही.‎आपण जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या‎नकाशाची आजच्या नकाशाशी तुलना केली, तर‎आपण थक्क होऊ.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *