28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निघाले होते, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विमानामध्ये असलेलं अतिरिक्त इंधन, डॅमेज झालेला ब्लॅक बॉक्स आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी होणारा विलंब यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे, यावरून अनेक दावे प्रतिदावे होत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत देखील मोठा दावा केला आहे. मला विलिनीकरणावर बोलायचं नाही, पण एक विषय मांडतो. दोन पक्ष एकत्र आले असते, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत. भावनिकदृष्टीकोनातून, जर विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे झाले असते. विलिनीकरणावर मी बोलणार नाही. कारण चर्चा भरकटते, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दुसऱ्या गटातील लोकांना विलिनीकरणावर बोलायला आवडतं. आम्ही फक्त घात किंवा अपघात यावर बोलत आहोत. अमोल कोल्हेंना विलिनीकरणाचा विषय माहीत आहे. अमोल कोल्हेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजे ही दादांची इच्छा होती. 13 बैठका झाल्या होत्या. ज्यांच्या घरी बैठका झाल्या, त्यांच्या घरजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासा. ट्रॅफिकचे फुटेज पाहा. नाही तर मंत्री लोढा यांच्या घरासमोरचे सीसीटीव्ही तपासा. दादा 13 वेळा वेगवेगळ्या गाडीतून विलिनीकरणाची चर्चा करण्यासाठी आले होते. घर जयंत पाटील यांचं होतं. जयंत पाटलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, दादांना पार्टी वाढवायची होती, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




