पुणे जिल्ह्यात मागील काळात झालेल्या मुसळधार अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जिल्ह्यातील तब्बल सात तालुक्यांमध्ये १६६.११ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि तब्बल १०७ पूल व मोऱ्या अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व नुकसान झालेल्या रस्त्यांची आणि पुलांच्या तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाकडे तब्बल ६८ कोटी २६ लाख रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रामुख्याने डोंगराळ आणि घाटमाथ्याचा भाग असलेल्या सात तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. यामध्ये भोर, मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह वाहत राहिल्याने रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक पूल व मोऱ्यांच्या संरचनेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण आणि शाळकरी मुलांची व कामगारांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी या रस्त्यांची आणि पुलांची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
संबंधित सात तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची एकूण लांबी ४ हजार ८७०.३१ किलोमीटर असून, त्यापैकी १६६.११ किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार, नुकसानग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४९ कोटी १६ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे, तर पूल व मोऱ्यांच्या पुनर्बाबांधणी व दुरुस्तीसाठी १९ कोटी १० लाख रुपयांची गरज भासणार आहे.
तालुकनिहाय नुकसानीची सविस्तर स्थिती:
-
मुळशी तालुका: येथे सर्वाधिक ६५.८० किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले असून २२ पूल व मोऱ्यांना फटका बसला आहे. या कामांसाठी प्रशासनाने १७ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
-
खेड तालुका: ३३.८३ किलोमीटर रस्ते आणि सर्वाधिक ३० पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीसाठी तब्बल २३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
-
भोर तालुका: १९.६६ किलोमीटर रस्ते आणि ३ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून १० कोटी ७५ लाख रुपयांची गरज आहे.
-
जुन्नर तालुका: १५.४० किलोमीटर रस्ते आणि २२ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मागितला आहे.
-
आंबेगाव तालुका: १२.७० किलोमीटर रस्ते आणि ८ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ४ कोटी ८१ लाख रुपये आवश्यक आहेत.
-
मावळ तालुका: १५ किलोमीटर रस्ते आणि २ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी आहे.
-
वेल्हे तालुका: ३.७२ किलोमीटर रस्ते आणि २० पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या रस्त्यांची आणि पुलांची तातडीने मलमपट्टी करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून, लवकरात लवकर निधी प्राप्त होऊन दुरुस्तीचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


