परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्नेहभोजनात न येण्याचे आम्ही कोणतेही कारण देऊ शकत नव्हतो. हा नियम फक्त दोनच प्रसंगी मोडला जायचा - जेव्हा कुणाला खूप ताप असेल किंवा देश युद्ध लढत असेल. जसे १९७१ चे बांगलादेश युद्ध, जेव्हा रस्त्यांवरील दिवेही बंद केले जायचे आणि सायकलच्या डायनामोला अर्धा काळा रंग लावला जायचा. आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात बसत असू, जिथे ना डायनिंग टेबल होते, ना गॅस स्टोव्ह असलेला किचन ओटा. या सोयीसुविधा माझ्या बहिणीच्या जन्मानंतर घरात आल्या.डायनिंग टेबलवरही आम्ही दोन्ही मुले एका दिशेला तोंड करून बसत असू आणि उरलेल्या दोन दिशांना आई-वडील बसत. दक्षिण दिशा रिकामी राहायची. पालकांच्या एका समजुतीमुळे आमच्या घरात दक्षिणेकडे तोंड करून जेवणे टाळले जायचे. ही समजूत वास्तुशास्त्र आणि ऊर्जेशी संबंधित पारंपरिक धारणांचे एक मिश्र रूप होते. रात्रीच्या जेवणादरम्यान वास्तुकला, ऊर्जा आणि मान्यतांसारख्या विषयांवर आईकडून मिळालेला हा माझा पहिला वादातीत धडा होता. म्हणूनच आज मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. दिवसातील किमान एक जेवण तरी एकत्र बसून घ्या आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा. काळाच्या ओघात तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक दिसून येईल. जेव्हा तुम्ही पालक बनता तेव्हा तुम्हाला केवळ भेटवस्तूच मिळत नाहीत, तर भरपूर सल्लाही मिळतो. पण माझा हा सल्ला तुमच्या मुलांना हमखास एक उत्तम माणूस बनवेल. अगदी माझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळी जेव्हा माझी आई रुग्णालयात होती, तेव्हाही आम्ही पिता-पुत्र साध्याशा जेवणासाठी एकत्र बसलो होतो. आम्हा दोघांमधील चर्चा नेहमीच दीर्घ चालायची. १० मिनिटे असो किंवा अर्धा तास, सोबत जेवण्याचा नियम ‘तडजोड नसणारा’ होता. अर्थात, त्याचा फायदाही झाला. बालपणीच्या या गोष्टी मला तेव्हा आठवल्या, जेव्हा नुकतेच मी ‘फॅमिली डिनर प्रोजेक्ट’ (एफडीपी) च्या कार्यकारी संचालिका डॉ. एमी फिशेल यांच्याबद्दल वाचले. त्या म्हणतात की, नियमित एफडीपीचा संबंध नैराश्य, चिंता, नशा किंवा तंबाखूचे व्यसन, ईटिंग डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि सध्या विकसित देशांमध्ये आढळणाऱ्या किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण कमी करण्याशी आहे. यामुळे लवचिकता आणि आत्मसन्मान वाढतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. प्री-स्कूलमधील मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि मोठ्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते. त्यांच्या सर्वेक्षणात एकत्र जेवणारी ८०% कुटुंबे ही परंपरा सुरू ठेवू इच्छितात, कारण किशोरवयीन मुलांना वाटते की त्या वेळी ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. जेवणाचा टेबल हे शिष्टाचार, संयम शिकण्याचे प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल उपकरणांच्या व्यत्ययाशिवाय एकत्र बसण्याची दुर्मिळ संधी असते. घरच्यांना हळू जेवणाऱ्यांची वाट पाहावी लागते आणि स्वयंपाक करणाऱ्या आईचे रोज आभार मानावे लागतात. मुले सहानुभूती शिकतात, चालू घडामोडींबद्दल जाणून घेतात आणि हळूहळू आपले मत मांडू लागतात. चित्रपट, पुस्तके, व्यवसाय आणि राजकारणावर चर्चा होते. मी सर्व तरुण पालकांना आग्रहाने सांगेन की त्यांनी अमांडा रिपली यांचे ‘द स्मार्टेस्ट किड्स इन द वर्ल्ड’ हे पुस्तक नक्की वाचावे. यात टेबलवर चर्चा सुरू करण्याचे उत्तम मार्ग सांगितले आहेत. फंडा असा की- कुटुंब म्हणून एकत्र जेवणे हे एखाद्या प्रकल्पापेक्षा कमी नाही. म्हणूनच याला ‘एफडीपी’ म्हटले गेले आहे. प्रत्येक जेवणाच्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपली आई जी मेहनत घेते, त्याचे खूप कौतुक झाले पाहिजे, कारण ती भावी पिढीला एक उत्तम माणूस बनवण्याचे काम करत असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



