एआयच्या मदतीने काम पूर्ण करणाऱ्या लोकांना विचारा की, ते याद्वारे किती वेळ वाचवतात? 'एआयने आमचे काम सोपे नाही तर अधिक कठीण केले आहे,' असे म्हणून ते तुम्हाला चकित करू शकतात. केवळ कर्मचाऱ्यांचीच नाही, तर एआयच्या सर्वात मोठ्या समर्थकांचीही हीच अपेक्षा होती की, यामुळे कामाचा भार कमी होईल आणि लोकांना उच्चस्तरीय सर्जनशील कामांसाठी अधिक वेळ मिळेल. बिल गेट्स आणि जेपी मॉर्गन चेसचे जेमी डायमन यांसारख्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांनीही म्हटले होते की, 'एआयमुळे अखेर लोकांना जास्त नाही तर कमी काम करावे लागेल आणि कामाचे दिवस कमी होऊ शकतात.' इलॉन मस्क यांनी तर म्हटले होते की, पुढील दोन दशकांत एआय आणि रोबोट्सच्या प्रगतीमुळे काम करणे हे ऐच्छिक ठरू शकते. परंतु, सध्या तरी सर्व काही याच्या उलट घडत असल्याचे संशोधनातून दिसून येत आहे. असे का घडत आहे? असे नाही की एआय कार्यक्षमता वाढवत नाही. खरे तर एआय जी क्षमता किंवा वेळ वाचवते, त्याचा वापर लगेच दुसऱ्या कामात केला जातो. यामुळेच कामाचा ताण वाढू लागतो. उदाहरणार्थ, जर कुणी एआयच्या मदतीने एखादा प्रकल्प करत असेल, तर प्राथमिक अहवाल काही सेकंदांत तयार होतो. पण त्याचसोबत एआय असेही सुचवते की, 'मी या गोष्टीचाही विचार करू का?' किंवा 'तुमच्या कंपनीच्या गरजेनुसार मी अंमलबजावणीची योजना जोडू शकतो' किंवा 'तुमच्या ग्राहकांची यादी मला माहीत असल्याने मी त्यांच्या आवडीनुसार यात बदल करू शकतो.' अशा प्रकारे एआय एकावर एक 7-8 स्तरांपर्यंत नवीन गोष्टी जोडत जाते, ज्याचा कर्मचाऱ्याने विचारही केलेला नसतो किंवा ज्यांची गरजही नसते. एआयच्या याच सवयीमुळे वापरकर्ता एकाच कामाच्या खोलात शिरत जातो आणि थकून जातो. 'ॲक्टिव्हट्रॅक' या उत्पादकता ट्रॅकिंग सॉफ्टवेअर कंपनीने नुकताच कामाच्या सवयींवर होणाऱ्या एआयच्या परिणामाचा एक मोठा अभ्यास पूर्ण केला. यामध्ये 1,111 नियोक्त्यांच्या 1.64 लाख कर्मचाऱ्यांच्या 44 कोटी तासांहून अधिक डिजिटल क्रियाकलापांचा अभ्यास करून काही मनोरंजक तथ्ये समोर आणली आहेत. एआय टूल्स वापरण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या 180 दिवसांतील कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण केल्यावर असे आढळले की, जवळपास सर्वच क्षेत्रांत कामाचा वेग वाढला. ईमेल, मेसेजिंग आणि चॅट ॲप्सवर घालवला जाणारा वेळ दुपटीहून अधिक झाला. दुसरीकडे, एकाग्रतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय केल्या जाणाऱ्या कामाचा वेळ 9 टक्क्यांनी कमी झाला. हा तो वेळ असतो जो गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन कल्पना तयार करण्यासाठी आणि त्या लागू करण्यासाठी आवश्यक असतो. प्रशासकीय कामे स्वयंचलित(ऑटोमेट) करण्यासाठी ज्या कंपन्यांनी एआय विकसित केले, त्यांनाही याचा फटका बसत आहे. कारण स्वयंचलित कामच पूर्ण होत नाहीये. कर्मचारी तेच काम वारंवार करणे, त्यात सुधारणा करणे आणि पुन्हा एआयच्या सूचना जोडण्यात गुंतलेले असतात. यात जास्त वेळ खर्ची पडतो. लोक कमी नाही
तर जास्त काम करत आहेत. बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या हास स्कूल ऑफ बिझनेसमधील सहयोगी प्राध्यापिका अरुणा रंगनाथन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'एआय आपल्याला अतिरिक्त कामात गुंतवून ठेवते. ते काम काही प्रमाणात सोपे करत असले तरी आपण त्यात अडकून पडतो, ज्यामुळे फक्त वेगाने काम केल्याची जाणीव होते.' एआय टूल्ससोबत काम करण्याचा सरासरी वेळ आठपटीने वाढला असल्याने, एआयचा वापर कसा करावा की ऊर्जा आणि उच्च उत्पादकता दोन्ही टिकून राहतील? तज्ज्ञांच्या मते, जे लोक आपल्या एकूण कामाच्या वेळेपैकी 7 ते 10 टक्के वेळ एआय टूल्सवर खर्च करतात, त्यांची उत्पादकता सर्वाधिक असते. फंडा हा आहे की, एआय ही दुधारी तलवार आहे. ते तुम्हाला वेगाने पुढे नेऊ शकते, पण अधिक खोलात जाण्यासाठी भुरळही घालू शकते. जर तुम्ही एकाच कामाच्या खोलात जात राहिलात, तर पुढचे काम करण्यासाठी तुम्ही पुन्हा मूळ पातळीवर येऊच शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी याचा वापर संयमाने करणेच हिताचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel





Promote our products—get paid for every sale you generate!