धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेच्या तेर गटात भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांचा पराभव केला. या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले होते, कारण येथील लढत घराणेशाही, पक्षबदल आणि भावनिक मुद्द्यांशी जोडली गेली होती.
घराणेशाहीचा आरोप आणि माघार घेण्याची तयारी
अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर घराणेशाहीचा जोरदार आरोप झाला. मतदार, नागरिक, माध्यमे आणि सोशल मीडियावरून त्यांच्या उमेदवार जोरदार टीका करण्यात आली होती. यामुळे अर्चना पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दाखवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षने त्यांचा अर्ज कायम ठेवण्याचा आदेश दिला. पक्षश्रद्धा मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि शेवटी विजय मिळवला!
अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल
या निकालाच्या पार्श्वभूमीवर एक भावनिक मुद्दा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाच्या (२८ जानेवारी २०२६) फक्त एक तास आधी त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता. मतदारसंघातील एखाद्या कामाबाबत बोलताना राणा पाटील यांच्या निरोपानंतर अजितदादांनी कॉल केला. सुमारे २ मिनिटे बोलणे झाले. त्यात ते बारामतीला पोहोचणार असल्याचे सांगितले. मात्र, विमानतळावर लँडिंगपूर्वीच अपघात झाला.
राणा जगजीतसिंह पाटील हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत. सुनेत्रा पवार या त्यांच्या सख्ख्या आत्या. पूर्वी पाटील कुटुंब राष्ट्रवादीतच होते, पण राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला.
सक्षणा सलगर यांचा पराभव
सक्षणा सलगर या मागील जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. यंदाही पक्षासाठी जोमाने प्रचार करत, राज्यभर फिरून ध्येय-धोरणे पोहोचवत, घणाघाती सभांमध्ये भाषणे देत होत्या. पण भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशा थेट लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर दमदाटी आणि पक्षीय रणनीतीचे आरोप केले आहेत. या निकालाने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, घराणेशाही आणि नातेवाईकत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्चना पाटील यांच्या विजयाने भाजपला धाराशिवमध्ये मजबूत पाया मिळाला आहे.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




