सांगली: पलूस शहरातील गंजीखाना परिसरात घरगुती वादातून पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३०च्या सुमारास राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा उपचार सुरू असताना मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४५च्या सुमारास सांगली सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला.
याबाबत त्यांचा मुलगा अजय कदम (वय २८, व्यवसाय: एमआयडीसीतील खासगी नोकरी, सध्या रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय असून, या दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अजय कदम हा आई-वडिलांपासून विभक्त होऊन कागल येथे राहतो. बाळासाहेब व उषा कदम हे दोघेच पलूस येथे राहत होते. ३० ऑगस्ट रोजी घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला असावा. त्यानंतर उषा यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी बाळासाहेब यांनीही विषारी औषध प्राशन केले. अजय याच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर बाळासाहेब यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते बेशुद्ध अवस्थेत होते व त्यांच्या तोंडातून फेस येत होता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उषा कदम यांची प्रकृतीही गंभीर असल्याने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२२ वाजता त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत्यूंची नोंद पलूस पोलिस ठाण्यात झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रूपाली कुरणे तपास करीत आहेत.
दुहेरी मृत्यूमागे नेमके कारण काय?
पतीचा घरात मृत्यू आणि त्यानंतर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दोघांनी विषारी औषध कोणत्या परिस्थितीत घेतले, त्यामागे कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक अथवा अन्य कारण होते का, याचा तपास सुरू आहे. बाळासाहेब यांच्या मृत्यूच्या ठिकाणी आढळलेला पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तसेच उषा यांनी विषारी औषध घेतल्याची नोंद यामुळे दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
महाराष्ट्र
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला



























Subscribe to my channel



