राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'स्ट्राईड्स २०२६' (STRIDES 2026) अहवालानुसार, भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या 'क्रिटिकल टायगर हॅबिटॅट' (गाभा क्षेत्र) मधून गावे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्याने देदीप्यमान कामगिरी करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. हे स्थलांतर व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
अहवालातील मुख्य निष्कर्ष: एनटीसीएच्या अहवालानुसार, देशातील विविध राज्यांच्या व्याघ्र प्रकल्पांतील गाभा क्षेत्रातून आतापर्यंत २९८ गावे आणि सुमारे ३२,१९८ कुटुंबांचे यशस्वीपणे पुनर्वसन करण्यात आले आहे. या मोहिमेत मध्य प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आतापर्यंत २५ गावे, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने २९ गावे स्थलांतरित करण्यात यश मिळवले आहे. मेळघाटमधून ४,७११ आणि सह्याद्रीतून २,०५६ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पुनर्वसनापुढील मोठी आव्हाने: जरी काही प्रकल्पांमध्ये चांगली प्रगती झाली असली तरी, अहवालातील आकडेवारी चिंताजनक चित्रही स्पष्ट करते. देशातील एकूण व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रात अजूनही ७४२ गावे आणि ९८,००० हून अधिक कुटुंबे वास्तव्य करत आहेत. याचा अर्थ, केवळ २८ टक्के गावेच आतापर्यंत स्थलांतरित होऊ शकली आहेत, तर ७२ टक्के गावे अजूनही जंगलाच्या गाभा क्षेत्रात आहेत. वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी आणि व्याघांना 'इनव्हायलेट' (मानवी हस्तक्षेप नसलेले) क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी या उर्वरित गावांचे स्थलांतर करणे हे मोठे आव्हान आहे.
स्वैच्छिक स्थलांतराचे महत्त्व: वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ आणि वनहक्क कायदा, २००६ नुसार हे संपूर्ण स्थलांतर 'स्वैच्छिक' स्वरूपाचे आहे. ग्रामसभांची संमती, वनहक्कांचे सेटलमेंट आणि कुटुंबांना सक्षम पुनर्वसन पॅकेज देणे या तत्त्वांवर आधारित ही प्रक्रिया राबवली जाते. केवळ व्याघ्र संवर्धनच नव्हे, तर जंगलात राहणाऱ्या समुदायांना शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. अमरावती आणि इतर दुर्गम भागांतील स्थलांतरित गावांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकार करत आहे. आगामी काळात या प्रक्रियेला गती देण्यासाठी निधी आणि तांत्रिक सहाय्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



