राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'स्ट्राईड्स २०२६' (STRIDES 2026) अहवालानुसार, भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या 'क्रिटिकल टायगर हॅबिटॅट' (गाभा क्षेत्र) मधून गावे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्याने देदीप्यमान कामगिरी करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. हे स्थलांतर व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
अहवालातील मुख्य निष्कर्ष: एनटीसीएच्या अहवालानुसार, देशातील विविध राज्यांच्या व्याघ्र प्रकल्पांतील गाभा क्षेत्रातून आतापर्यंत २९८ गावे आणि सुमारे ३२,१९८ कुटुंबांचे यशस्वीपणे पुनर्वसन करण्यात आले आहे. या मोहिमेत मध्य प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आतापर्यंत २५ गावे, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने २९ गावे स्थलांतरित करण्यात यश मिळवले आहे. मेळघाटमधून ४,७११ आणि सह्याद्रीतून २,०५६ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पुनर्वसनापुढील मोठी आव्हाने: जरी काही प्रकल्पांमध्ये चांगली प्रगती झाली असली तरी, अहवालातील आकडेवारी चिंताजनक चित्रही स्पष्ट करते. देशातील एकूण व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रात अजूनही ७४२ गावे आणि ९८,००० हून अधिक कुटुंबे वास्तव्य करत आहेत. याचा अर्थ, केवळ २८ टक्के गावेच आतापर्यंत स्थलांतरित होऊ शकली आहेत, तर ७२ टक्के गावे अजूनही जंगलाच्या गाभा क्षेत्रात आहेत. वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी आणि व्याघांना 'इनव्हायलेट' (मानवी हस्तक्षेप नसलेले) क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी या उर्वरित गावांचे स्थलांतर करणे हे मोठे आव्हान आहे.
स्वैच्छिक स्थलांतराचे महत्त्व: वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ आणि वनहक्क कायदा, २००६ नुसार हे संपूर्ण स्थलांतर 'स्वैच्छिक' स्वरूपाचे आहे. ग्रामसभांची संमती, वनहक्कांचे सेटलमेंट आणि कुटुंबांना सक्षम पुनर्वसन पॅकेज देणे या तत्त्वांवर आधारित ही प्रक्रिया राबवली जाते. केवळ व्याघ्र संवर्धनच नव्हे, तर जंगलात राहणाऱ्या समुदायांना शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. अमरावती आणि इतर दुर्गम भागांतील स्थलांतरित गावांना आता मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकार करत आहे. आगामी काळात या प्रक्रियेला गती देण्यासाठी निधी आणि तांत्रिक सहाय्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शहर
- नागपूर: अवघ्या ६ महिन्यांत २८ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू ;कीटकनाशकांच्या वाढत्या धोक्याने शेती क्षेत्र हादरले
- सातारा: पालखी बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात; पुणे–पंढरपूर महामार्गावर ५ पोलीस जखमी
- मुंबई: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, मार्ग बंद; प्रचंड वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
- मुंबई: शेअर बाजारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, मात्र IBM मुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका.
महाराष्ट्र
- नागपूर: अवघ्या ६ महिन्यांत २८ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू ;कीटकनाशकांच्या वाढत्या धोक्याने शेती क्षेत्र हादरले
- सातारा: पालखी बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात; पुणे–पंढरपूर महामार्गावर ५ पोलीस जखमी
- मुंबई: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, मार्ग बंद; प्रचंड वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
- मुंबई: शेअर बाजारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, मात्र IBM मुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका.
गुन्हा
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
राजकीय
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
इतर
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बीअरसाठी १० रुपये जास्त आकारल्याचा आरोप; थेट मुख्यमंत्री विजय यांना तक्रार करत ग्राहकाचा व्हिडिओ व्हायरल
- पुणे: होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावरील हल्ल्यात मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत.
- तेलंगणा: भ्रष्टाचारावर ACBचा मोठा प्रहार! HMDAच्या मुख्य अभियंत्याच्या ठिकाणी छापे; १०० कोटींची मालमत्ता उघड
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.

























Subscribe to my channel



