जनतेची लूट थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू! स्मार्ट मीटरविरोधात 'आप' फुंकणार रणशिंग.

नवी दिल्ली : देशभरात वेगाने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर योजनांवर आता मोठा राजकीय वाद पेटताना दिसत आहे. Sanjay Singh यांनी स्मार्ट मीटरला थेट “स्मार्ट चीटर” संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशावर डाका टाकण्यासाठीच ही योजना राबवली जात असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक धक्कादायक उदाहरणे दिली. “ज्या घरांमध्ये पूर्वी ७०० ते ८०० रुपयांचे वीज बिल येत होते, तिथे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर थेट ४००० ते ५००० रुपयांपर्यंत बिल पोहोचत आहे. हे मीटर इतक्या वेगाने धावत आहेत की त्यांचा वेग धावपटू Milkha Singh यांच्यापेक्षाही जास्त वाटतो,” असा टोला त्यांनी लगावला.

त्यांनी सरकारला थेट सवाल करत विचारले की, “वीज वापर कमी असतानाही बिल वाढते कसे? स्मार्ट मीटर नेमके जनतेच्या सुविधेसाठी आहेत की काही कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी?” या योजनेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे की, दिल्लीपुरतेच नव्हे तर ज्या-ज्या राज्यांत स्मार्ट मीटरमुळे ग्राहक त्रस्त आहेत, तिथे पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. वाढीव वीजबिलांचा प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र वाढती वीजदरवाढ, त्यात स्मार्ट मीटरमुळे वाढल्याचा दावा होणारी बिले आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढताना दिसत आहे.

आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेसमोर आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय —
स्मार्ट मीटर खरंच तंत्रज्ञानाची क्रांती आहे की सामान्य माणसाच्या खिशावरचा नवा आर्थिक हल्ला?

जनतेला पारदर्शक व्यवस्था मिळणार की “स्मार्ट” नावाखाली सुरू राहणार आर्थिक लूट?



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *