रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाच्या समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ कार अनियंत्रित होऊन तब्बल ८०० ते १००० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत गाडीमधील सर्व ८ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव परिसरातील रहिवासी होते.
पर्यटनाचा आनंद ठरला शेवटचा:मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील रहिवासी असलेले हे मित्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि हर्णे बीच येथे पर्यटनासाठी गेले होते. दोन दिवस कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त आनंद लुटल्यानंतर, हे सर्वजण आपल्या स्कॉर्पिओ गाडीने पुन्हा साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील दाभिळ गावच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली.
सततचा प्रवास आणि थकव्यामुळे चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य):शनिवारी-रविवारपासून तरुणांशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला असता, ही कार दरीत कोसळल्याचे समोर आले. घाटातील अतिशय अवघड मार्ग, विस्तीर्ण दरी, घनदाट जंगल आणि अंधार यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. बचाव पथकांनी दुर्बिणीच्या साहाय्याने मृतदेहांचा आणि गाडीचा शोध घेतला.
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाडची सिस्केप रेस्क्यू टीम आणि पोलादपूर पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. दोरखंडाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा निसरड्या दरीत उतरून रात्रीपासून मदतकार्य राबवले जात आहे.
मृतांची नावे: प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (२२), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), मर्ढे येथील करण आनंद शिंगटे (२१), निखिल अभिमन्यू शिंगटे (२५), खटाव येथील चालक संदीप अशोक काटकर (३७) आणि चिपळूण येथील अंश समीर चव्हाण (१९) यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आणि तरुणांच्या गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




