रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाच्या समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ कार अनियंत्रित होऊन तब्बल ८०० ते १००० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत गाडीमधील सर्व ८ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव परिसरातील रहिवासी होते.
पर्यटनाचा आनंद ठरला शेवटचा:मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील रहिवासी असलेले हे मित्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि हर्णे बीच येथे पर्यटनासाठी गेले होते. दोन दिवस कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त आनंद लुटल्यानंतर, हे सर्वजण आपल्या स्कॉर्पिओ गाडीने पुन्हा साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील दाभिळ गावच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली.
सततचा प्रवास आणि थकव्यामुळे चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य):शनिवारी-रविवारपासून तरुणांशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला असता, ही कार दरीत कोसळल्याचे समोर आले. घाटातील अतिशय अवघड मार्ग, विस्तीर्ण दरी, घनदाट जंगल आणि अंधार यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. बचाव पथकांनी दुर्बिणीच्या साहाय्याने मृतदेहांचा आणि गाडीचा शोध घेतला.
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाडची सिस्केप रेस्क्यू टीम आणि पोलादपूर पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. दोरखंडाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा निसरड्या दरीत उतरून रात्रीपासून मदतकार्य राबवले जात आहे.
मृतांची नावे: प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (२२), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), मर्ढे येथील करण आनंद शिंगटे (२१), निखिल अभिमन्यू शिंगटे (२५), खटाव येथील चालक संदीप अशोक काटकर (३७) आणि चिपळूण येथील अंश समीर चव्हाण (१९) यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आणि तरुणांच्या गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




