
Sanjay Raut : मराठी हिंदी भाषिक वादानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना काल निशिकांत दुबे यांनी चुकीचे वक्तव्य करून मराठी माणसांच्या भावना दुखावल्या. यावर अनेक नेत्यांनी दुबे यांची कानउघडणी केली. याप्रकरणी संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत "कोण आहे हा दुबे ? मराठी माणसाला पटकून पटकून मारणं हे मोदी शहांची बूट चाटण्याइतकं सोप्प आहे का ?" अशा प्रकारचा पलटवार केला आहे. तसेच आज मीरा भाईंदर येथे होत असलेल्या मोर्चा प्रकरणी राऊत यांनी "महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे" असे देखील म्हटले आहे.
गल्लीबोळ्यापासून सुरु झालेल्या मराठी हिंदी भाषिक वादाचे राजकारणातही पडसाद उमटू लागले आहे. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी काल मराठी माणसे आमच्या पैशांवर जगतात अशी गरळ ओकली. तसेच "आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा." असे खुले आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले. त्यानंतर सगळ्या नेत्यांनी दुबे यांची परखड शब्दात कानउघडणी केली.
याप्रकरणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत " कोण आहे हा दुबे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहत आहोत आणि खात आहोत तुमच्या बापाचं खात नाही. त्या दुबेला म्हणावं महाराष्ट्राच्या नादाला लागू नको, नाहीतर पटकनी काय आहे ते आम्हाला दाखवाव लागेल. डरपोक लोक आहात तुम्ही. निशिकांत दुबे आम्ही इथे कोणत्याही महाराष्ट्र मध्ये उत्तर भारतीय वरती हल्ला केला नाही. हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने सांगितले पाहिजे. कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही अपशब्द वापरला नाही.
काय माहित आहे त्या दुबेला? मराठी माणसाला पटकून पटकून मारणार, हे उद्योगपती यांचे दलाली करून कमिशन खोरी करण्याइतकं सोपा आहे का? दुबे हे मोदी शहा यांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेत बसलेला आहे. मौवा मोहिते यांना विचारा, त्यांची मुलाखत घ्या. दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक डिग्री. जसा गुरु जसा चेला आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देत आहात" अशा प्रकारे राऊत यांनी दुबे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मीरा - भाईंदरमध्ये होत असलेल्या मोर्चावर काय म्हणाले संजय राऊत ?
अमराठी व्यापाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून मीरा - भाईंदरमध्ये मनसैनिकांनी मराठी बाणा दाखवत मोर्चा काढला आहे. या मोर्चाला सरकारकडून संमती देण्यात आलेली नाही. या मोर्चापूर्वीच पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मनसे नेत्यांना घरी जाऊन अटक करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी "मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली? या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा? हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे. " असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, " मीरा भाईंदर मध्ये सर्वपक्षीय त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढत आहेत. आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते. आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते, मग परवानगी नाकारले जाते. आणि अचानक पोलीस बाळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे दोन वाजता तीन वाजता जाऊन अटक केली जाते. हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे का ? की मोरारजी देसाई यांचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरात गेला आहे. त्यामुळे फडणवीस हे अघोरी काम करायला लागले. मला भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाई प्रमाणे गोळ्या झाडून जे १०६ हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील.
अशा प्रकारचा वर्तन देवेंद्र फडणवीस करत आहेत. पहाटे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी अविनाश जाधव राजू पाटील शिवसेनेचे काही प्रमुख नेते आहेत. मयेकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत. इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत. त्या सगळ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या मोर्चा काढू नका आणि मग त्यांना अटक केली कशाकरता? कोणासाठी ? तुमच्यावरती कोणत्या दुबेचा दबाव आहे? हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. " अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


