
Sangli : सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या छोट्याशा गावाने हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपली आहे. या गावात गेल्या ४४ वर्षांपासून मशिदीमध्ये गणपती बसवला जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जिथं मुस्लीम समाज आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवत आहे. गेल्या ४४ वर्षांपासून मुस्लीम समाज ही परंपरा जोपासत आहे.
काय घडलं होतं?
४४ वर्षांपूर्वी गोटखिंडी गावात झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील बुजुर्ग मंडळींनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. गणपतीचे पावसापासून रक्षण झाले.
पुढच्या वर्षी गावात एक बैठक घेतली गेली. या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली. त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठपणा होऊ लागली. मुस्लीम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा, अर्चना, आरती करून प्रसादाचे वाटप करतात. सर्व गावकरी यावेळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.
|
|
दंगल काळातही सलोखा अबाधित
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २००९ मध्ये गणपतीच्या काळातच मोठी हिंदू मुस्लीम दंगल झाली होती. दोन्ही समाजात त्यावेळी मोठी तेढ निर्माण झाली होती. पण, गोटखिंडी गावात अशा निकराच्या प्रसंगी सुद्धा हिंदू मुस्लीम ऐक्य अबाधित राहिलं. धार्मिक सलोखा अबाधित राहिला.
गोटखिंडीमध्ये हे दोन्ही समाज एकोप्याने, गुण्या गोविंदाने राहतात. आजच्या दूषित सामाजिक वातावरणात असे सामाजिक धार्मिक ऐक्याचे चित्र तसे दुर्मिळच आहे. गणपतीच्या काळात म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या काळात दोन तीनदा मोहरम आणि बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे सण एकत्रितपणे आले होते. तेव्हाही मुस्लिम समाजाने त्या काळात कुर्बानी न देता हा सण अनंत चतुर्दशीच्या नंतर साजरा केला होता.
याच काळात एकदा मोहरमचा सण आला होता तेव्हा त्यांनी मोहरमच्या पंजांची स्थापना आणि गणपतीची स्थापना एकाच ठिकाणी केली होती. इतका एकोपा या गावातील दोन्ही समाजाचे बांधव जपत आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे. असे उपक्रम सर्वत्र व्हायला हवेत. त्यामुळे आपण सर्व धर्मीय लोक एका समाजात गुण्यागोवंदाने राहू शकू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
- भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ
महाराष्ट्र
- लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




