पुणे: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे १४ जून रोजी पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती, तर अनेकजण जखमी झाले होते. या दुर्दैवी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र ही घोषणा अजूनही कागदावरच असल्याचे समोर आले आहे. या नवीन पुलाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तांत्रिक बाबीही पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पुलाच्या प्रस्तावित जागेवर नवीन पूल बांधण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरक्षेच्या कारणावरून तीव्र विरोध दर्शविला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा जुना पूल मोडकळीस आल्यानंतर आणि दुर्घटना घडल्यानंतर गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी आवश्यक असलेला सविस्तर आराखडा तयार करून राज्य सरकारकडून ८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला. तसेच पुलावर सुरक्षेच्या कारणास्तव दोन ठिकाणी जाळी उभारण्याचा प्रस्ताव होता, ज्याच्या अतिरिक्त खर्चाला 'पीएमआरडीए'नेही मान्यता दिली होती. सुरुवातीला डीआरडीओने याला विरोध केला नव्हता, परंतु जेव्हा पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी खणकाम सुरू झाले, तेव्हा हा पूल संस्थेच्या १०० मीटर परिसरात येत असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुढे करत डीआरडीओने या बांधकामास विरोध केला.
या वादानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 'डीआरडीओ'सह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची दोन वेळा उच्चस्तरीय बैठक घेतली, परंतु डीआरडीओने या जागेवर परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर या ठिकाणी केवळ पादचारी पूल उभारावा असा पर्याय पुढे आला होता, परंतु ग्रामस्थांनी वाहतुकीसाठी रहदारीचा मुख्य पूल असावा अशी ठाम मागणी केली. ग्रामस्थांच्या या मागणीमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागावर पुलासाठी नवीन जागा शोधण्याची वेळ आली आहे.
सध्या जुन्या पुलाच्या पुढे साधारण ३०० मीटर अंतरावर नवीन जागा निश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या नवीन जागेचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच अंतिम जागा ठरवली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने यापूर्वी मंजूर केलेल्या ८ कोटींच्या निधीतूनच या नवीन ठिकाणी पुलाचे बांधकाम केले जाईल, मात्र नवीन रचनेमध्ये जाळ्या बसविण्यात येणार नाहीत. तसेच ग्रामस्थांच्या रहदारीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांना हा पूल जोडण्यासाठी काही खाजगी जमीन संपादित करावी लागणार असून, त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी जमीन संपादनासाठी सहमती दर्शविली आहे. तांत्रिक आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन जमीन संपादनाविषयी अंतिम निर्णय घेणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे आणि नवीन जागा शोधावी लागल्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी किमान आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल


























Subscribe to my channel




