ब्लॅक बॉक्सवरून रोहित पवार यांचा रोखठोक सवालImage Credit source: TV9
राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचा बारामतीजवळ विमान अपघात झाला. 28 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले. त्यांच जाणं अख्ख्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक होतं. पवार कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेला आता जवळपास 3 आठवडे उलटून गेले असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे, असा संशय, अशी शंका अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून ते या मुद्यावर सातत्याने भाष्य करत असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई, दिल्लीत पत्रकार परिषद घेून अपघाताच्या आदल्या दिवशीचा संपूर्ण घटना क्रम मांडला. तसेच काही पुरावेही दिले. याप्रकरणी लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही पुढले मुद्देही मांडले. विमानातील इंधन, ब्लॅक बॉक्स याबद्दलही सातत्याने प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. ब्लॅक बॉक्स, व्हॉईस रेकॉर्डरचं थोडं नुकसान झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. याच मुद्यावरून आता रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ब्लॅक बॉक्स कसा जळाला ?
अजित पवार यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यातील 5 जणांचेही मृतदेह बरेच होरपळले होते. मात्र विमान जिथे कोसळलं, त्याच्या आजूबाजूला काही कागदपत्रं पडली होती. ते कागद जराही जळाले नव्हते. याच मुद्याचा आधार घेत रोहित पवारांनी रोखठोक प्रश्न विचारले आहेत.
विमानातील ब्लॅकबॉक्स जळाला, असं सांगण्यात येत आहे. खरं सांगायचं झालं तर 1100 डिग्री सेल्सिअस असताना, तिथे 1 तास ब्लॅक बॉक्स पडला असेल तरच तो थोडा डॅमेज होतो, असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. जर सहा हजार मीटर खोली पर्यंत पाण्याचं प्रेशर असेल तर अशा परिस्थितीतसुद्धा विमानातला ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. विमान पडलं तिथे बरेच कागद होते, पण ते कमी जळले. स्फोटाचा धक्का काही सेकंदाचा असतो. त्यामुळे कागद जळत नाही, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
आणि विमानाची बॉडी पाहिली तर त्याच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हा जो प्रचार सुरू होता, जे सांगण्यात येतंय ते केवळ मॅन्यूप्युलेट करण्यासाठी आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. जर तिथले पेपर जळाले नाही, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? असा रोखठोक सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. आत्तापर्यंत इतर देशातही असेच अपघात झाले, तिथेही अशीच सेम आग लागली. त्या आगीची तीव्रताही तितकी सेम होती. अगदी सेम घटना होती. तरीही तिथे ( त्या विमानाच्या अपघातस्थळी) ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलं.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




