रोहित पवार, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Rohit Pawar-Ajit Pawar-Supriya Sule: अजितदादांचा विमान अपघात की घातपात असा सवाल केल्या जात आहे. आमदार रोहित पवार यांनी तर पुराव्यांची मालिका समोर आणत, घटनाक्रम जुळवत वैमानिकांच्या मदतीने हा घातपात घडवल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर सकाळी अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. रोहित पवारांनी हा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरला. खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनी सुद्धा या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार अनेक उच्चपदस्थांची नावे घेत आहेत अथवा त्याकडे काहीतरी इंगित करत आहेत. या भूमिकेने त्यांच्या जीवाला धोका होण्याची भीती पवार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
रोहित पवारांच्या दाव्यांनी खळबळ
अजितदादांचा मृत्यू विमान अपघातात झाला की तो घातपात आहे याबाबत रोहित पवारांनी दोन पत्रकार परिषद घेतल्या. त्यात त्यांनी प्रेझेन्टेशन सादर केले. त्यांनी पुराव्यासह बाजू मांडली. VSR कंपनीच्या एकूणच कारभारावर आणि तिला वाचवणारे स्टेकहोल्डरवर त्यांनी सडकून टीका केली. कंपनीचा मालक कुठे फरार झाला. तर त्याच्याशी कोणकोणत्या पक्षाच्या वरिष्ठांचे संबंध आहे इथपर्यंत त्यांनी पुरावे मांडले. तर एका खासदाराचे व्हीएसआर कंपनीत भागीदारी असल्याचाही दावा केला. या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत, याचे विश्लेषण त्यांनी पत्रपरिषदेतून केले.
तपास यंत्रणांच्या संथगतीवर टीका
त्यांनी याप्रकरणी तपास यंत्रणांच्या कारभारावर आणि संथगतीवरही टीका केली. अगोदर ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा करणारी यंत्रणा रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र वठणीवर आल्याचे दिसत आहे. डेटा डाऊनलोड केल्याचा दावाही समोर येत आहे. एकूणच तपास यंत्रणांवर कुणाचा तरी दबाव असल्याचे रोहित पवारांचं म्हणणं खरं आहे का असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्वसामान्यांनी हा घातपात आहे की अपघात यावर बोलण्यास सुरुवात केली. हा विषय लावून धरला. ते बोलत होते.
दादांना उशीर का झाला?
पहिल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसर्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती असे म्हटले. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं असा दावा त्यांनी केला होता.
रोहित पवारांना कुणाकडून धोका?
रोहित पवार ज्या अर्थी उच्च पदस्थांवर आणि यंत्रणांवर सडकून टीका आणि आरोप करत आहेत, त्यावरून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पवार कुटुंबियांचा सध्या तरी सूर दिसत आहेत. पण रोहित पवारांच्या जीवाला कुणाकडून धोका आहे ,याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. पण रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या कुटुंबाला भीती वाटत असल्याचे समोर आणले. पत्नी, मुलं, आई, सासरे आणि नातेवाईकांना माझ्या जीवाला धोका असल्याची भीती वाटत असल्याचे ते म्हणाले. पण घाबरून प्रश्न विचारणं सोडून देता येणार नाही असे ते म्हणाले.
तर खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार हे अभ्यासूपणे हे प्रकरण लावून धरत आहेत. त्यामुळे त्यांना सरकारने सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर विमान अपघाताच्या बाबत येणार्या अहवालाबाबत आम्ही हट्ट धरला होता. संसदेत आम्ही हा विषय मांडला असून संसदेत आम्ही उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




