
Anil Parab Demands Ramdas Kadam Narco Test : शिंदेंच्या शिवसेनेचे रामदास कदम यांच्या आरोपाला ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट कराच, पण त्यासोबत ज्योती रामदास कदम यांनी १९९३ मध्ये जाळून घेतलं की जाळलं? त्याबाबतही नार्को टेस्ट करण्याची मागणी मी करतो. रामदास कदम यांचं डोकं ठिकाणावर नाही. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आणि खोटे आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचेही राजकारण केले जातेय. माणसं चोरली, पक्ष चोरले पण काही झाले नाही.त्यामुळे आता बाळासाहेबांच्या मृत्यूचे राजकारण करून उद्धव ठाकरे वाईट असल्याचे दाखवण्याचे काम सुरू आहे. अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले.
रामदास कदम यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. मातोश्रीवर रामदास कदम झोपलेला बाकडा मी शोधत आहे, असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेना नेते अनिल परब यांनी केलाय. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे कुणी घेतले? याचीही चौकशी झालीच पाहिजे? त्याशिवाय खेडमधील १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी पेटवून घेतलं की पेटवलं? याचीही चौकशी करायला पाहिजे. त्या घटनेचे साक्षीदार माझ्याकडे आहेत, वेळ पडली तर मी त्यांना पुढे आणू शकतो, असे परब म्हणाले.
गृहराज्यमंत्र्यांच्या (योगेश रामदास कदम) आईने पेटवून घेतलं होतं. रामदास कदमांच्या मुलानेच त्याची चौकशी करावी. १९९३ च्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. खेडमध्ये धुमाकूळ सुरू आहे. जमिनी बळकावल्या, लोकांना त्रास दिला जातोय, या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. रामदास कदम यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहेत? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
मुंबई मनपा त्यांची होऊ शकत नाही. त्यामुळे रामदास कदम यांना पुढे करायचे अन् मूळ मुद्द्यापासून दूर करायचं. शिशूपाल यांचे आता १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत. त्यांचे सर्व पुरावे येणाऱ्या अधिवेशनात दाखवणार आहे. मुख्यमंत्री यांना इतके पाठीशी का घालतात? यांच्यामुळे मुख्यमंत्री डागाळलेले आहेत. ते वाळूचोर, माफियांना का वाचवत आहेत? माझा सवाल आहे. रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर माफी मागावी लागणार आहेच, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपातील सत्य बाहेर आलेच पाहिजे? असे अनिल परब म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांची नार्को टेस्ट करावी. मी शिवसेनाचा आमदार म्हणून सांगतोय, १९९३ मध्ये ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतले की जाळून घेण्याचा प्रयत्न केला, याचाही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मी मागणी करतोय, असे अनिल परब म्हणाले. रामदास कदम यांनी केलेले आरोप निराधार आहेत. बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी शेकडो लाखो लोक होते. कोणताही मृतदेह शवपेटीशिवाय ठेवता येतो का? त्यांचे डोकं ठिकाणावर नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच मृत्यू जाहीर झाला.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



