
Pune : पुणेकरांची एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पुण्यापासून थेट अबु धाबीपर्यंत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेल्या काही काळापासून पुण्यातील प्रवाशांची युरोप, यूएई आणि इतर गल्फ देशांपर्यंत थेट कनेक्टिव्हिटीची मागणी वाढत होती. या मागणीला मिळालेला हा प्रतिसाद देत एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
ही सेवा 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून, पुणेकरांच्या अंतराराष्ट्रीय पर्यटनाला आता वेग येणार आहे. पुण्यातून दर आठवड्याला तीन थेट उड्डाणे अबु धाबीला जाणार असून, प्रवाशांना गल्फ देशात जाण्यासाठी आता मुंबईतून ट्रान्स्फर घेण्याची गरज राहणार नाही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्या उद्देशाने गल्फमध्ये जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा आहे.
|
|
पुणे–अबु धाबी थेट विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असून, पुण्याहून विमान रात्री 20:50 वाजता उड्डाण घेऊन, 22:45 वाजता अबु धाबीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, अबु धाबीहून फ्लाइट 23:45 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:15 वाजता पुण्यात पोहचेल.
एअर इंडिया एक्सप्रेसने महाराष्ट्रातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या हेतूने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासोबतच नागपूर–बंगळुरू मार्गावरील उड्डाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या मार्गावर दिवसातून दोन उड्डाणे, सकाळी 10 वाजता नागपूरहून सुटून 12.05 ला बंगळुरू, आणि रात्री 9.05 ची दुसरी फ्लाइट जी 11.10 वाजता बंगळुरूला पोहोचेल. परतीची दोन फ्लाइट्स बंगळुरूहून सकाळी7. 25 वाजता (नागपूर 9.30) आणि संध्याकाळी 6.30 (नागपूर 8.35) अशी असतील. नागपूरची भर पडल्याने मागील दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने एकूण पाच नवीन स्टेशन सुरू केले असून आता कंपनीच्या नेटवर्कमधील डेस्टिनेशन्सची संख्या 60 वर पोहोचली आहे.
याशिवाय लवकरच कंपनी नवी मुंबई विमानतळावरून आठवड्याला उड्डाणांना सुरुवात करणार असून, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख केंद्रांशी नवी मुंबईची थेट जोडणी होणार आहे. महाराष्ट्रभरात एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती वाढवण्याच्या या निर्णयामुळे राज्यातील हवाई वाहतुकीला एकत्रितपणे वाढ मिळणार आहे
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!



























Subscribe to my channel

