
Pune : शिवाजीनगर मतदारसंघात आजवर दुरंगी लढत होत असल्याने भाजप विरुद्ध काँग्रेस ही पारंपरिक लढत कायम राहिली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपचे विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात काँग्रेसने दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंड पुकारले असून, या मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे.
भाजपने विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली, तरी काँग्रेसने उमेदवार निश्चित करण्यास विलंब लावला. गेल्या निवडणुकीत दत्ता बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली होती. या वेळी मनीष आनंद हेदेखील इच्छुक होते. दोन्ही इच्छुक तुल्यबळ असल्याने काँग्रेसपुढे कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्न होता. शेवटच्या क्षणी बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मनीष आनंद नाराज झाले. उमेदवारीपासून डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे.
या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी मनीष आनंद यांनी अनेक महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने त्यांनी जनसंपर्क वाढविला होता. त्यांची पत्नी पूजा आनंद यांच्याकडे काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष पद असल्याने त्यांनीही महिला मतदारांच्या संपर्कावर भर दिला होता. मात्र, काँग्रेसने पुन्हा बहिरट यांना उमेदवारी दिल्याने मनीष आनंद यांनी बंडखोरी केली. मनीष आनंद यांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे बहिरट यांची कोंडी झाली आहे, तर विद्यामान आमदार शिरोळे यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन मनीष आनंद यांची साथ दिल्याने या मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ राबविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
|
|
बहिरट हे २०१२ मध्ये महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये ते पराभूत झाले. मनीष आनंद हे २००८ मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत मनीष आणि त्यांच्या पत्नी पूजा हे दोघेही निवडून आले होते. त्यांचे या भागात प्राबल्य आहे. शिरोळे हे नगरसेवक हाते. त्यानंतर मागील निवडणुकीत ते आमदार झाले.
आतापर्यंत या मतदारसंघात दुरंगी लढत होत होती. पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे हे १९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढून मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. त्यानंतर १९७८ पासून या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. दिवंगत खासदार अण्णा जोशी हे १९८० आणि १९८५ मध्ये निवडून आले होते. १९९० मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी १९९० आणि १९९५ मध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९९ च्या निवडणुकीत सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तोपर्यंत कोथरूडचा परिसर या मतदारसंघात होता. २००९ मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कोथरूड हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्या वेळी निम्हण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र निम्हण यांचा भाजपचे माजी आमदार विजय काळे यांनी पराभव केला. मागील निवडणुकीत काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. यंदा पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. मनीष आनंद यांच्या उमेदवारीमुळे लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत या मतदारसंघात दुरंगी लढत होत होती. पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे हे १९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढून मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. त्यानंतर १९७८ पासून या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. दिवंगत खासदार अण्णा जोशी हे १९८० आणि १९८५ मध्ये निवडून आले होते. १९९० मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी १९९० आणि १९९५ मध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९९ च्या निवडणुकीत सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तोपर्यंत कोथरूडचा परिसर या मतदारसंघात होता. २००९ मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कोथरूड हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्या वेळी निम्हण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत मात्र निम्हण यांचा भाजपचे माजी आमदार विजय काळे यांनी पराभव केला. मागील निवडणुकीत काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. यंदा पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. मनीष आनंद यांच्या उमेदवारीमुळे लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




