
Pune : पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुढे आल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही (पीएमआरडीए) त्यांच्या हद्दीतील खड्ड्यांची धास्ती घेतली आहे. मात्र, रस्ते दुरुस्तीची जबाबदारी झटकताना रस्त्यांच्या दुरवस्थेला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
हिंजवडीतील आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनसह अनेक संघटना सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना न झाल्याने पावसाळ्यात आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढल्याचे दिसून आले होते. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर भागातील रस्त्यांची अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाहणी करण्यात आली होती. मात्र, रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, यावरून मात्र पहिल्यापासूनच मेट्रो, पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली होती.
या सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येक यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कोंडी वाढत असल्याचेही दिसले होते. त्यातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पुणे पोलिसांना पत्र दिल्याने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पीएमआरडीए प्रशासनाने ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
|
|
‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा,’ या तत्त्वावर शिवाजीनगर-हिंजवड मेट्रो मार्गिकेचे काम करणाऱ्या पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. ‘पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडकडे संबंधित भागातील रस्त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपासून गणेश खिंड, पाषाण, बाणेरसह कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित रस्ते कायम वर्दळीचे असल्यामुळे या रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे चालकांना खड्डे चुकवत त्यातून मार्ग काढावा लागतो. संबंधित यंत्रणेने करारानुसार रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र वारंवार सांगून देखील पीआयटीसीएमआरएल याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे,’ असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची सूचना रस्त्यांची दुरवस्था झाल्याने येत्या बुधवारपर्यंत (२५ सप्टेंबर) रस्ते पूर्ववत करावेत, असे डाॅ. योगेश म्हसे यांनी या नोटिशीत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी (२६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. म्हणजे या दौऱ्यापूर्वीच रस्ते दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या पत्रानंतर पुणे पोलिसांनीही पुणे महापालिकेला पत्र पाठवून पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करण्याबाबत कळवले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



