
Delhi News : उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.
एकट्या हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराच्या जवानांकडून (Army Jawan) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या ६ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये गेल्या २४ तासांत ३९ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बियास नदीच्या प्रवाहामुळे अनेक घरं वाहून गेल्या आणि पूल देखील कोसळले आहेत.
गेल्या ७२ तासांत देशांतील विविध राज्यांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 34 जणांचा, हिमाचल प्रदेशमध्ये ५४ जणांचा, जम्मू-काश्मीरमध्ये 15 जणांचा, दिल्लीत 5 जणांचा आणि राजस्थान आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये ९२ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतपर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
|
Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ४ दुचाकींना धडक, वाहनांचा अक्षरश: चक्काचूर |
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये मध्य प्रदेशातील पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळली. या अपघातात इंदूरच्या ४ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नदीचे पाणी २०६.३२ मीटरने वाहत होते.
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे आलेल्या पूरात उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपर्यंत उत्तरप्रदेशच्या ६५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारकडून मदत आणि सहकार्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



