
Pimpri : मागील आठ वर्षांपासून राज्याची सूत्रे भाजपकडे आहेत. भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले. केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच, लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिल्याने भाजपचा राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन आम्ही थांबवू शकलो, असेही ते म्हणाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी गावजत्रा मैदानावर पवार यांची सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, माजी आमदार विलास लांडे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने चारशे पारचा नारा दिला. बहुमतासाठी चारशे जागांची आवश्यकता नसतानाही हा नारा दिला होता. कारण, राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशे खासदार हवे होते. घटनेत सुधारणा करून सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा उद्देश भाजपचा होता. लोकशाही, घटनेवर होणारा हल्ला राज्यातील जनतेने हाणून पाडला. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्यामुळे राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन थांबल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग आले. त्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले.
|
Pimpri : बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई |
देशाच्या बाहेर पिंपरी-चिंचवडचे नाव मोठे झाले. हिंजवडीत माहिती तंत्रज्ञाननगरी आणली. हिंजवडीत गेल्यावर परदेशात गेल्यासारखे वाटते. कोट्यवधी रुपयांची निर्यात हिंजवडीतून होते. परदेशातील कंपन्यांची मुख्य कार्यालये हिंजवडीत आहेत. शिक्षणानंतर उद्योग आणि आयटीचे माहेरघर म्हणून आता पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी वाढल्याने चाकण, रांजणगाव, शिरवळ, तळेगाव दाभाडे या भागात नवीन कारखानदारी उभी केली.
एकीकडे राज्य शासन लाडकी बहीण योजना राबवत आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाले, या घटनेमुळे राज्याचे नाव खराब झाले. गेल्या वर्षभरात ८८६ मुली बेपत्ता आहेत. मग, शासन बहिणींची काय काळजी घेत आहे, असा सवालही पवार यांनी केला.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला




























Subscribe to my channel
