
Pimpri : मागील आठ वर्षांपासून राज्याची सूत्रे भाजपकडे आहेत. भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले. केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच, लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिल्याने भाजपचा राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन आम्ही थांबवू शकलो, असेही ते म्हणाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी गावजत्रा मैदानावर पवार यांची सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, माजी आमदार विलास लांडे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने चारशे पारचा नारा दिला. बहुमतासाठी चारशे जागांची आवश्यकता नसतानाही हा नारा दिला होता. कारण, राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशे खासदार हवे होते. घटनेत सुधारणा करून सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा उद्देश भाजपचा होता. लोकशाही, घटनेवर होणारा हल्ला राज्यातील जनतेने हाणून पाडला. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्यामुळे राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन थांबल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग आले. त्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले.
|
Pimpri : बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई |
देशाच्या बाहेर पिंपरी-चिंचवडचे नाव मोठे झाले. हिंजवडीत माहिती तंत्रज्ञाननगरी आणली. हिंजवडीत गेल्यावर परदेशात गेल्यासारखे वाटते. कोट्यवधी रुपयांची निर्यात हिंजवडीतून होते. परदेशातील कंपन्यांची मुख्य कार्यालये हिंजवडीत आहेत. शिक्षणानंतर उद्योग आणि आयटीचे माहेरघर म्हणून आता पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी वाढल्याने चाकण, रांजणगाव, शिरवळ, तळेगाव दाभाडे या भागात नवीन कारखानदारी उभी केली.
एकीकडे राज्य शासन लाडकी बहीण योजना राबवत आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाले, या घटनेमुळे राज्याचे नाव खराब झाले. गेल्या वर्षभरात ८८६ मुली बेपत्ता आहेत. मग, शासन बहिणींची काय काळजी घेत आहे, असा सवालही पवार यांनी केला.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"

























Subscribe to my channel




