
Pune : शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेली गर्दी आणि काही पंप बंद असल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर आता स्पष्टता आली आहे. पेट्रोल असोसिएशनच्या कोअर कमिटीचे सदस्य अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती तुटवड्यामुळे नसून तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे निर्माण झाली आहे. अचानक क्रेडिट विड्रॉ केल्यामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पेट्रोलचा तुटवडा नसून, काही पंप मालकांकडे आगाऊ इंधन खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्यामुळेच पंप बंद ठेवावे लागले आहेत. जे पंप चालक ॲडव्हान्स पेमेंट करू शकले नाहीत, त्यांचेच पंप सध्या बंद आहेत, असं अली दारुवाला यांनी स्पष्ट केलं आहे.
“पेट्रोलचा भाव एकही रुपया वाढणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. देशात इतका मोठा साठा उपलब्ध आहे की साठवण्यासाठी जागा कमी पडेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनच्या भीतीमुळे नागरिक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल साठवून ठेवत आहेत. एक-दोन लिटरऐवजी थेट 10 लिटर पेट्रोल घेण्याची घाई सुरू असल्याने पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे. नागरिकांनी पंपांवर गर्दी करू नये आणि जास्तीचे पेट्रोल साठवू नये", असे आवाहन त्यांनी केले आहे. "सध्या दिसणारी परिस्थिती ही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली असून, प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही", असं अली दारुवाला यांनी स्पष्ट केलं.
'१०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना'
दरम्यान, "एक सकारात्मक आणि अतिशय चांगली गुडन्यूस समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता इराणचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात बैठक झाली. त्यानंतर इराणने भारतासह जगातील पाच देशांना इंधन वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. भारताकडे निघालेले सर्व टँकर्स पुढील ८ ते ९ दिवसांत सुरक्षितपणे पोहोचणार आहेत. भारताला पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि एलएनजीचा पुरवठा करण्यासाठी जवळपास १०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. पुढील ९ ते १० दिवसांत हा पुरवठा देशात पोहोचणार आहे", अशी माहिती अली दारुवाला यांनी दिली.
'परिस्थिती सुरळीत होणार'
याशिवाय, "सरकारला इंधनावर लिटरमागे सुमारे ५० रुपयांचा फटका बसत असल्याने सध्या ॲडव्हान्स पेमेंट घेऊनच इंधन पुरवठा केला जात आहे. तसेच पीएनजी पाइपलाईनचे रखडलेले कामही उद्यापासून पूर्ण होणार आहे. एकूणच, भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील १० ते १२ दिवसांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा", असे आवाहन अली दारुवाला यांनी केले.
शहर
- आटपाडी बाजारात डाळिंबाची विक्रमी आवक, शेतकऱ्यांना मोठा दिलासा! डाळिंबाला मिळाला प्रतिकिलो १७१ रुपयांचा विक्रमी दर!
- हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले! अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नपदार्थांमुळे १० हॉटेल्सचे परवाने निलंबित; एफडीएची मोठी कारवाई.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- पुणे: सहकाऱ्याच्या अमानुष कृत्यामुळे ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू
महाराष्ट्र
- आटपाडी बाजारात डाळिंबाची विक्रमी आवक, शेतकऱ्यांना मोठा दिलासा! डाळिंबाला मिळाला प्रतिकिलो १७१ रुपयांचा विक्रमी दर!
- हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले! अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नपदार्थांमुळे १० हॉटेल्सचे परवाने निलंबित; एफडीएची मोठी कारवाई.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- पुणे: सहकाऱ्याच्या अमानुष कृत्यामुळे ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू
गुन्हा
- साताऱ्यात बनावट नोटांचे रॅकेट उघड; उरूलच्या सरपंचासह पाच जणांवर गुन्हा दाखल, १७ बनावट नोटा जप्त.
- शिक्षकांचे साडेपाच वर्षांचे वेतन लाटले! पुण्यातील सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह सात जणांवर ५.०६ कोटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल.
- लातूर: कौटुंबिक वादातून पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! ४ जुलै रोजी सोन्याने गाठली दीड लाखाची पातळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर.
- जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा दबदबा! एआय फॉर गुड ग्लोबल कमिशनमध्ये मुकेश अंबानी, सुनील मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांची 'फाउंडिंग मेंबर' म्हणून निवड.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पती-पत्नीला कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलचे डिटेल्स लपवता येणार नाहीत; गोपनीयतेचा दावा फेटाळला
- भूतानने नाकारले भारताचे 'E20 पेट्रोल'; तांत्रिक अडचणी आणि आर्द्रतेच्या भीतीने घेतला निर्णय!























Subscribe to my channel




