
Operation Sindoor Pahalgam revenge : पहलगाममध्ये निष्पाप पर्यटाकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मरून भारताने बदला घेतला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची ९ तळ नष्ट केले. २५ मिनिटांत भारताच्या लष्कराने पाकिस्तानवर स्ट्राइक करत अद्दल घडवली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २५ भारतीय महिलांचे कुंकू पुसले होते, याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत ७० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराचे कौतुक केले जातेय. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक करताना रामायणातील सुंदरकांडाशी या ऑपरेशनचा संबंध जोडला. आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले, ज्याप्रमाणे त्यांनी अशोक वाटिकेत फक्त शत्रूंना लक्ष्य केले. “ज्यांनी मला मारले, त्यांनाच मी मारले.” आम्ही केवळ त्या दहशतवाद्यांना मारले, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले, असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाइल हल् केले. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे नऊ तळ नष्ट केले आणि ७० दहशतवाद्यांना मारले. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईनंतर पहिल्यांदा बोलताना रामायणातील सुंदरकांडाशी या ऑपरेशनचा संबंध जोडला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या (BRO) स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत ते बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे प्रभू हनुमानाच्या सुंदरकांडातील आदर्शांवर आधारित आहे. ज्याप्रमाणे हनुमानजींनी अशोक वाटिकेत रावणाच्या सैन्याला लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
सुंदरकांडातील चौपाई :
“जिन्ह मोहि मारा, तिन मोहि मारे। तेहि पर बांधेउं तनयं तुम्हारे। मोहि न कछु बांधे कइ लाजा। कीन्ह चहउं निज प्रभु कर काजा।”
याचा अर्थ,
“आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले, ज्याप्रमाणे त्यांनी अशोक वाटिकेत फक्त शत्रूंना लक्ष्य केले. “ज्यांनी मला मारले, त्यांनाच मी मारले.” आम्ही केवळ त्या दहशतवाद्यांना मारले, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले.”
राजनाथ सिंह म्हणाले की, 'भारतीय सैन्याने राफेल जेट्स, स्कॅल्प मिसाइल्स आणि डीआरडीओच्या ड्रोन्सद्वारे २५ मिनिटात दहशतवाद्याचे नऊ तळ नष्ट केले होते. मुरिदके, सियालकोट, बहावलपूर, मुजफ्फराबाद येथील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांचा नाश केला. हा हल्ला अचूक आणि संवेदनशीलतेने केला. '
पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्यांना “बिनबुडाचे” ठरवत युद्धाची धमकी दिली. यामुळे नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव वाढला. पुंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने हवाई आणि समुद्री सीमा सतर्क केल् आहेत. नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. सीमावर्ती गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


