
Operation Sindoor Pahalgam revenge : पहलगाममध्ये निष्पाप पर्यटाकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मरून भारताने बदला घेतला. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची ९ तळ नष्ट केले. २५ मिनिटांत भारताच्या लष्कराने पाकिस्तानवर स्ट्राइक करत अद्दल घडवली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २५ भारतीय महिलांचे कुंकू पुसले होते, याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत ७० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराचे कौतुक केले जातेय. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक करताना रामायणातील सुंदरकांडाशी या ऑपरेशनचा संबंध जोडला. आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले, ज्याप्रमाणे त्यांनी अशोक वाटिकेत फक्त शत्रूंना लक्ष्य केले. “ज्यांनी मला मारले, त्यांनाच मी मारले.” आम्ही केवळ त्या दहशतवाद्यांना मारले, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले, असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाइल हल् केले. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे नऊ तळ नष्ट केले आणि ७० दहशतवाद्यांना मारले. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईनंतर पहिल्यांदा बोलताना रामायणातील सुंदरकांडाशी या ऑपरेशनचा संबंध जोडला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या (BRO) स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत ते बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे प्रभू हनुमानाच्या सुंदरकांडातील आदर्शांवर आधारित आहे. ज्याप्रमाणे हनुमानजींनी अशोक वाटिकेत रावणाच्या सैन्याला लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
सुंदरकांडातील चौपाई :
“जिन्ह मोहि मारा, तिन मोहि मारे। तेहि पर बांधेउं तनयं तुम्हारे। मोहि न कछु बांधे कइ लाजा। कीन्ह चहउं निज प्रभु कर काजा।”
याचा अर्थ,
“आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले, ज्याप्रमाणे त्यांनी अशोक वाटिकेत फक्त शत्रूंना लक्ष्य केले. “ज्यांनी मला मारले, त्यांनाच मी मारले.” आम्ही केवळ त्या दहशतवाद्यांना मारले, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेतले.”
राजनाथ सिंह म्हणाले की, 'भारतीय सैन्याने राफेल जेट्स, स्कॅल्प मिसाइल्स आणि डीआरडीओच्या ड्रोन्सद्वारे २५ मिनिटात दहशतवाद्याचे नऊ तळ नष्ट केले होते. मुरिदके, सियालकोट, बहावलपूर, मुजफ्फराबाद येथील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांचा नाश केला. हा हल्ला अचूक आणि संवेदनशीलतेने केला. '
पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्यांना “बिनबुडाचे” ठरवत युद्धाची धमकी दिली. यामुळे नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव वाढला. पुंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने हवाई आणि समुद्री सीमा सतर्क केल् आहेत. नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. सीमावर्ती गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



