New Mumbai : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे अेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २ जण अद्यापही बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमध्ये गोव्यावरून मुंबईमध्ये पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह सापडला पण तिच्या मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवावरून सोनाली गावंढळ ही महिला पासपोर्ट वेरिफिकेशनसाठी मुंबईला आली होती. तिच्यासोबत तिची मोठी बहीण, तिचा नवरा आणि त्यांची २ लहान मुलं मुंबईमध्ये आली होती. २ दिवस मुंबई फिरता येईल म्हणून हे सर्वजण सोनालीसोबत आले होते.
मुंबईत आल्यावर बोटीने एलिफंटा जाण्याचा त्यांचा प्लॅन झाला. मात्र बोट दुर्घटनेमुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. सोनालीची बहीण सकीना पठाण आणि तिचा ६ वर्षीय मुलाचा या बोट दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. सकीनाचा मृतदेह उरण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय. पण तिचा चिमुकला अद्यापही बेपत्ता आहे.
|
Onion Market : कांदा दराबाबत शेतकरी संतप्त; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद |
'दुर्घटना घडली त्यावेळी लाईफ जॅकेट घातले नव्हते. स्पीड बोट धडकल्यानंतर बोटीत पाणी शिरू लागल्यावर लाईफ जॅकेट घालण्यास सांगण्यात आले. बोटीत फक्त ५० लाईफ जॅकेट होते. त्यामुळे अनेकांना लाईफ जॅकेट मिळाले नाहीत.' असा गंभीर आरोप सोनालीने केला आहे. 'आम्ही बोटीच्या वरच्या बाजूला होतो तर बहीण खाली होती. तिला लाईफ जॅकेट मिळाले नाही. बोट बुडू लागली तसे खाली असलेले लोकं पाण्यात बुडाले त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही. सकीनाचा मृतदेह तरी सापडला. मात्र तिच्या ६ वर्षांच्या मुलाचा शोध सुरू आहे. ', असे सोनाली यांनी सांगितले.
सोनाली स्वतः बोटीला धरून राहिल्याने वाचल्या तर बहिणीच्या नवऱ्याने एका हाताने बोट पकडली तर दुसऱ्या हाताने १० महिन्यांच्या बाळाला पकडले. बाळाच्या तोंडात पाणी जाऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यांनी स्वत:चा जीव मुठीमध्ये धरून त्याचा जीव वाचवला. कुठून दुर्बद्धी सुचली आणि आम्ही फिरायला इथे आलो.' अशी खंत सोनालीने व्यक्त केली.
दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने बुधवारी धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामधील ९० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर उरणच्या जेएनपीटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा



























Subscribe to my channel


