नवी मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. प्रलंबित बिलाचा धनादेश मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडे तब्बल १५ टक्के लाचेची मागणी करणाऱ्या एपीएमसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (१९ मे) रंगेहात अटक केली. १ लाख ४० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना ही धडक कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेले अधिकारी
या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाचे उपसचिव (प्रभारी) तथा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक शरद आवटे (वय ४०) आणि स्वच्छता विभागाचा प्रभारी कार्यभार सांभाळणारा जनरेटर ऑपरेटर समीर म्हात्रे (वय ५५) यांचा समावेश आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
तक्रारदार कंत्राटदाराला ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीसाठी एपीएमसी आवारातील नालेसफाई आणि वार्षिक देखभालीचे कंत्राट मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने ११ लाख ९२ हजार ७१६ रुपयांचे बिल मंजुरीसाठी सादर केले होते. जीएसटी (GST) वगळता या बिलाची निव्वळ रक्कम ९ लाख ७८ हजार २७ रुपये इतकी होती.
हे बिल मंजूर करून देण्याचा मोबदला म्हणून डॉ. दीपक आवटे आणि समीर म्हात्रे यांनी कंत्राटदाराकडे एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजेच १ लाख ४६ हजार रुपयांच्या लाचेची (कमिशन) मागणी केली. कंत्राटदाराने बिलासाठी तगादा लावल्यानंतर, अखेर १ लाख ४० हजार रुपयांवर तडजोड झाली.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने थेट नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कांदा-बटाटा मार्केटमधील एपीएमसीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उपसचिव कार्यालयात सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे कंत्राटदार लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचला. तिथे समीर म्हात्रे याने डॉ. आवटे यांच्या सांगण्यावरून १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




