
Mumbai Indians : आयपीएलमध्ये (IPL) पाचवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचंप्लेऑफमधील आव्हान सर्वप्रथम संपलं. मुंबईच्या खेळाडूंना समाधानकारक कामगिरी न करता आल्यानं त्यांच्यावर ही वेळ आली. आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंटसयांच्यात वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार आहे. लखनौ सुपर जाएंटसला पराभूत करुन विजयानं आयपीएलमधील प्रवासाचा शेवट करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. मुंबईच्या मॅनेजमेंटच्या निर्णयानुसार हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन करण्याचा मॅनेजमेंटचा निर्णय यशस्वी झाल्याचं दिसत नाही. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीनंमोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा आणि अभिषेक नायरच्या व्हायरल व्हिडीओचा संदर्भ देत मनोज तिवारीनं भाष्य केलं. रोहित शर्माला देखील स्वत:ला वाटत नसेल की रिटेन व्हावं, असं तिवारीनं क्रिकबझच्या कार्यक्रमात म्हटलं.
मनोज तिवारी काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सनं कोणत्या चार स्टार खेळाडूंना आगामी आयपीएलमध्ये रिटेन करावं असा प्रश्न निवेदकानं विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना मनोज तिवारीनं सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला रिटेन करावं असं मत मांडलं. सूर्यकुमार यादव किंवा बुमराहकडे नेतृत्त्व दिल्यास मुंबईच्या वातावरणात कसा बदल होतो ते पाहा, असं तिवारी म्हणाला.परकीय खेळाडूंना देखील रिटेन करावं असं वाटत नाही. टीम डेविडला देखील रिटेन करु नये, असं मत असल्याचं तिवारीनं सांगितलं. पोलार्डची कमी भरुन काढण्यासाठी त्याला आणलं गेलं होतं. मात्र, तो अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकला नाही, असं तिवारी म्हणाला.
|
|
मनोज तिवारी पुढे म्हणाला की, असं वाटतंय की रोहितला स्वत:ला असं वाटत नसेल की रिटेन व्हावं. तिवारीनं रोहित शर्मा आणि अभिषेक नायर या दोघांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओचा दाखला देत वक्तव्य केलं. मनोज तिवारीन विरेंद्र सेहवाग समोरचं हे भाष्य केलं. केकेआरनं रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र, नंतर तो डीलिट करण्यात आला होता.
सूर्यकुमार यादव किंवा बुमराहला कॅप्टन करण्याचा सल्ला
मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये क्वालिफाय करु शकत नाही, असं म्हटलं होतं. मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह या दोघांपैकी एकाकडे नेतृत्त्व द्यावं, असं मनोज तिवारीनं म्हटलं.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




