
Mumbai : मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या 38 दिवसांच्या लहान बाळाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आले असल्याचे समजते. बाळाचे अपहरण करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाळाला सुरक्षित आणि सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी परिमंडळ 12 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टीम तैनात करण्यात आल्या. सहा दिवस अहोरात्र मेहनत करत तब्बल 11000 रिक्षा चालक आणि एक लाखाहून अधिक मोबाईल नंबर तसेच हजारो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात वनराई पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी मुंबईच्या मालवणी मालाड परिसरातून चारही आरोपींना अटक केली. सध्या आरोपी हे वनराई पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपींनी यापूर्वी मुंबईत अशाप्रकारे कुठे लहान मुलांची चोरी करून विक्री केली आहे का, याबाबत वनराई पोलीस अधिक तपास करत आहे
|
Pune : विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन |
मिळालेल्या माहितीनुसार,सुरेश सलाट व त्यांची पत्नी सोनी सलाट हे जोडपे आपल्या तीन लहान मुलांसोबत गुजरात येथून मुंबईत दोन मार्च रोजी चादरी विक्रीकरीता आले होते. दिवसभर वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव परिसरात त्यांनी सादरी विकल्या आणि रात्रीच्या वेळी त्यांना वसईला जाण्याकरीता त्यांना रेल्वे न मिळाल्याने ते फुटपाथवर झोपले.त्याच दरम्यान त्यांचा 38 दिवसाचा मुलगा पहाटे सर्व कुटुंबीय गाढ झोपले असताना अज्ञात व्यक्तीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरी (अपहरण) करून घेऊन गेले. मात्र झोपेतून उठल्यानंतर त्यांचा सर्वात लहान मुलगा गायब असल्याचे समजतात त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आई-वडिलांच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी कलम १३७ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व दत्तात्रय ढोले, सहाय्यक पोलीस आयुषव दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु माने यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या लहान मुलाचा शोधासाठी पोलिसांची सहा पथके तयार केली.याचदरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये अंगात एका व्यक्ताने हुडी घातली असल्याचे दिसून आले. यानंतर वनराई पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणारी पिवळ्या रंगाच्या रिक्षाचा नंबरही स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील सर्व पिवळ्या रंगाच्या मागील दोन वर्षात आलेल्या रिक्षांचा शोध घेतला. त्यासोबतच पोलिसांनी एक लाख पेक्षा अधिक मोबाईल नंबरधारकांची तपासणी करत आरोपी मालाड मालवणी परिसरातून शोधून काढला.
सलग सहा दिवस वनराई पोलिसांच्या सहा टीमने अहोरात्र मेहनत घेत सापळा रचून आरोपी राजू मोरे आणि मंगल मोरे यांच्या घरावर पाळत ठेवून नऊ तारखेला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींना अटक केली. आरोपींच्या घरी तो लहान मुलगा आढळून आला, त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतर वनराई पोलिसांच्या तपास पथकाने ते बाळ आपल्या मूळ आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी वनराई पोलिसांनी मुख्य आरोपी राजू मोरे, मंगल मोरे, फातिमा जिलानी शेख, आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान यांना विक्रीसाठी लहान मुलाच्या चोरी करणे प्रकरणे अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी यापूर्वी कधी लहान मुलाची चोरी करून विक्री केली आहे का? किंवा लहान मुलं चोरी करणाऱ्या टोळीच्या हे लोक संपर्कात आहेत का, यासंदर्भात वनराई पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




