
Mumbai : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अखेरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. असे असताना लोकार्पण होण्याआधीच इगतपुरी – आमणे महामार्गावरून वाहने धावू लागली आहेत. यामुळे अपघातांची भितीही व्यक्त होत असून अनधिकृत वाहनांना रोखण्याचे आव्हानही एमएसआरडीसीसमोर उभे ठाकले आहे.
चारचाकीसह ट्रकही धावतात
एमएसआरडीसीच्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर – इगतपुरी महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या ७६ किमी लांबीच्या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या अंतिम कामे सुरू असून ही कामे १५-२० दिवसात पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. पण हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याआधीच इगपुरी – आमणे महामार्गावरून, महामार्गातील पाच बोगद्यांतून वाहने धावू लागली आहेत.
या महामार्गाचा आसपासच्या गावातील वाहनचालकांपासून ते मुंबईतून, इतर ठिकाणाहून येणाऱ्या वाहनचालकांकडून सर्रास वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चारचाकी वाहने आणि ट्रकही अनधिकृतपणे महामार्गावरून जात आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला नसताना वाहने धावत असल्याने अपघातांची भिती निर्माण झाली आहे. तर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
|
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला? |
अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी
इगतपुरी – आमणे महामार्गावर अनधिकृतपणे वाहने धावत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अखेर आता एमएसआरडीसीला जाग आली आहे. एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे. स्थानिक मंडळी जबरदस्तीने, सुरक्षा रक्षकांवर अरेरावी करत महामार्गांवरून प्रवास करत आहेत. याची गंभीर दखल घेत महामार्ग पूर्णत: वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर वाहनांविरोधात कारवाई करण्याचेही निर्देश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पाचपैकी सर्वात मोठ्या बोगद्याला प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार आता बंद करण्यात आले आहे. मात्र उर्वरित चार छोट्या बोगद्यांना प्रवेशद्वार नाही. त्यामुळे या बोगद्यातून आणि उर्वरित महामार्गावरून स्थानिकांच्या वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. या वाहनांना रोखणे अवघड असल्याचे एमएसआरडीसीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता इगतपुरी – आमणे टप्प्यात अनधिकृतपणे धावणाऱ्या वाहनांना एमएसआरडीसी कसे रोखणार असा प्रश्न आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




