
Mumbai : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अखेरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. असे असताना लोकार्पण होण्याआधीच इगतपुरी – आमणे महामार्गावरून वाहने धावू लागली आहेत. यामुळे अपघातांची भितीही व्यक्त होत असून अनधिकृत वाहनांना रोखण्याचे आव्हानही एमएसआरडीसीसमोर उभे ठाकले आहे.
चारचाकीसह ट्रकही धावतात
एमएसआरडीसीच्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर – इगतपुरी महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या ७६ किमी लांबीच्या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या अंतिम कामे सुरू असून ही कामे १५-२० दिवसात पूर्ण करून एप्रिलअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. पण हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याआधीच इगपुरी – आमणे महामार्गावरून, महामार्गातील पाच बोगद्यांतून वाहने धावू लागली आहेत.
या महामार्गाचा आसपासच्या गावातील वाहनचालकांपासून ते मुंबईतून, इतर ठिकाणाहून येणाऱ्या वाहनचालकांकडून सर्रास वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चारचाकी वाहने आणि ट्रकही अनधिकृतपणे महामार्गावरून जात आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला नसताना वाहने धावत असल्याने अपघातांची भिती निर्माण झाली आहे. तर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
|
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला? |
अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी
इगतपुरी – आमणे महामार्गावर अनधिकृतपणे वाहने धावत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अखेर आता एमएसआरडीसीला जाग आली आहे. एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे. स्थानिक मंडळी जबरदस्तीने, सुरक्षा रक्षकांवर अरेरावी करत महामार्गांवरून प्रवास करत आहेत. याची गंभीर दखल घेत महामार्ग पूर्णत: वाहनांसाठी बंद करण्याचे आदेश मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर वाहनांविरोधात कारवाई करण्याचेही निर्देश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पाचपैकी सर्वात मोठ्या बोगद्याला प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार आता बंद करण्यात आले आहे. मात्र उर्वरित चार छोट्या बोगद्यांना प्रवेशद्वार नाही. त्यामुळे या बोगद्यातून आणि उर्वरित महामार्गावरून स्थानिकांच्या वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. या वाहनांना रोखणे अवघड असल्याचे एमएसआरडीसीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता इगतपुरी – आमणे टप्प्यात अनधिकृतपणे धावणाऱ्या वाहनांना एमएसआरडीसी कसे रोखणार असा प्रश्न आहे.
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




