
Mumbai : मुंबईत दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने आपल्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 2018 सालची आहे. याप्रकरणी सहा वर्षांनंतर न्यायालयाने मारेकरी वडिलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मृताच्या आईने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तब्बल सहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.तळशीकर यांनी सलीम शेख याला हत्येप्रकरणी दोषी ठरवले. त्याने आपल्या मुलाच्या हत्येचा गुन्हा केल्याचे फिर्यादीने यशस्वीपणे सिद्ध केले आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
काय होते नेमके प्रकरण
सलीमच्या दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास इम्रानने नकार दिला होता. त्यावरून मारेकरी सलीम शेख याचे मुलगा इम्रानसोबत भांडण झाले होते. शेखने आपल्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याने भांडणाने भयानक वळण घेतले. यादरम्यान मुलाने आपला जीव वाचवण्यासाठी पटकन पोलिस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात घरातून पळत असताना सलीमने इम्रानचा पाठलाग केला. त्याच्यावर कात्रीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल केले असता त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इम्रान दारूच्या नशेत होता, असा दावा सलीमच्या वकिलाने केला आहे. धारदार शस्त्राने त्याने स्वत:वर वार केले होते. असा युक्तीवाद करण्यात आला होता. तर दुसरीकडे वडिलाकडून त्याच्यावर कात्रीने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. पीडितेला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
|
|
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पीडितेच्या शरीरावर काही जखमा त्याने स्वतःच केल्या होत्या, असेही बचाव पक्षाने म्हटले आहे. मात्र, न्यायालयाने युक्तिवाद फेटाळून लावत पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला असता, तर त्याची आई मदतीसाठी पोलिस ठाण्यात गेली नसती, असे सांगितले. याचे पुरावे पोलिस ठाण्यात आहेत.
इम्रानने आत्महत्या केली असती तर घटनास्थळावरून पळून जाण्याऐवजी त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबत राहून त्याला रुग्णालयात दाखल केले असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दुस-या साक्षीदाराने पिता-पुत्रातील भांडणाबद्दलही सांगितले होते तसेच त्याने वैद्यकीय पुराव्यालाही पुष्टी दिली होती.
हे दुर्मिळ प्रकरण असल्याचे सांगून फिर्यादी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या दुर्मिळ श्रेणीत बसत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती लक्षात घेता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



