
Maratha Reservation: राहेरी बु. गांव हे आमदार, खासदार, नेत्यांना गावात प्रवेशबंदी करणारे विदर्भातील पहिले गाव ठरले आहे. त्यामुळे त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. तालुक्यातील राहेरी बु. गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केल्याचे फलक झळकले असून आमदार, खासदार नेते व पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नये, असे फलक लावण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विदर्भामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे राहेरी हे पहिले गांव ठरले आहे.
|
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस; विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी |
तालुक्यातील राहेरी बु. गांवाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून नेत्यांना गावबंदी केल्याने व आक्रमक भूमिका घेतल्याने आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गावबंदीच्या फलकामुळे लोकप्रतिनिधीची कोंडी होणार आहे. गाव जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात नेत्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राहेरी बु. येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
गावातील एक रहिवासी मदन देशमुख यांनी यावेळी सांगितले की, जोवर आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोवर कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना गावामध्ये येऊ देणार नाही, अन्यथा गावांमध्ये आल्यास त्यांचा अपमान करण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. असेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.
राहेरी बु. गावच्या प्रवेशद्वारावर गावबंदीचा फलक लावतांना मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. गावबंदीचे लोण विदर्भात सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




