पुणे: पर्यटकांसाठी पावसाळी धोक्यामुळे प्रमुख किल्ले आणि धबधब्यांवर ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी!

पुणे: जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कुठे आहे बंदी?
प्रशासनाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना जाण्यास मनाई केली आहे. यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे:

किल्ले: मावळ तालुक्यातील लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना किल्ले.

 

धबधबे व पर्यटन स्थळे: भाजे धबधबा, लोणावळा परिसरातील टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, एकवीरा देवी आणि कार्ला लेणी परिसर, तसेच पवना धरण परिसर.

रेल्वे सेवेबाबत अपडेट:
अतिवृष्टीमुळे कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याने ४४ तासांहून अधिक काळ बंद असलेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा आता अंशतः पूर्वपदावर येत आहे. रेल्वे प्रशासनाने घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली असून, उर्वरित दोन मार्गिकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तरीही, सुरक्षेच्या कारणास्तव आजही काही गाड्या (उदा. डेक्कन, डेक्कन क्वीन, इंटरसिटी) रद्द राहतील. रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी अधिकृत ॲप किंवा हेल्पलाइनवरून गाड्यांची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *